शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

आश्चर्य, नागपूरकर करतात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:03 PM

कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरकर तापमानामुळे असहाय झाले आहे. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण थांबविणे प्रशासनाला सहज शक्य नाही. परंतु कचऱ्याचे शहर अशी ओळख प्रशासनाला पुसता येऊ शकते. आज १२०० मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा होत आहे आणि २०१२ पासून तो केवळ साठविला जात आहे.

ठळक मुद्देजागतिक वसुंधरा दिवसप्लास्टिकबंदी, प्रक्रिया उद्योगाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात नागपूरकर तापमानामुळे असहाय झाले आहे. वाढते काँक्रिटीकरण, वाहनांचे प्रदूषण थांबविणे प्रशासनाला सहज शक्य नाही. परंतु कचऱ्याचे शहर अशी ओळख प्रशासनाला पुसता येऊ शकते. आज १२०० मेट्रिक टन कचरा शहरातून गोळा होत आहे आणि २०१२ पासून तो केवळ साठविला जात आहे.वसुंधरेच्या संवर्धनासाठी जगात ‘अर्थ डे नेटवर्क ’ ही संस्था कार्यरत आहे. २२ एप्रिल १९७० पासून संस्था ‘वसुंधरा दिवस’ साजरा करते. आज १९५ देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. यावर्षी वसुंधरा दिवसाची थीम ‘प्लास्टिकबंदी’ आहे. वसुंधरेच्या संवर्धनाच्या बाबतीत बोलत असताना ‘प्लास्टिकबंदी’ ही नागपूरसारख्या विकसनशील शहरासाठीसुद्धा लागू होते. शहरातून दररोज निघणारा १२०० टन कचऱ्यापैकी १२ ते १५ टक्के म्हणजेच १५० मेट्रिक टन कचरा हा प्लास्टिकचा निघतो. महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदी केली, कारण प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ती गरजेचीही आहे. त्याचे परिणाम मुंबईमध्ये २०१५ ला बघायलाही मिळाले आहे. नागपुरातही आज प्लास्टिकमुळे पारंपरिक जलस्रोत नष्ट होत आहे. शहरातील नाले, ड्रेनेज सिस्टिम प्लास्टिकमुळे चोक होत आहे. पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. प्लास्टिक नष्ट करण्यासाठी नागपुरात यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे फक्त प्लास्टिीक साठविले जात आहे. जो उन्हाळ्याच्या दिवसात लागलेल्या आगीमध्ये नष्ट होतो आहे. परंतु प्लास्टिक जळाल्याने जे रासायनिक घटक वातावरणात पसरत आहेत ते आजाराला निमंत्रण देणारे आहे. प्लास्टिक हे मनुष्यासाठीच नाही तर जनावरांसाठीसुद्धा धोकादायक ठरत आहे. बंदी लावली पण अंमलबजावणीचे काय?सरकारने यापूर्वीही प्लास्टिकबंदीच्या नावावर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅगच्या विक्रीवर बंदी घातली होती. ती अजूनही यशस्वी झाली नाही. मार्च २०१८ ला प्लास्टिकबंदीसंदर्भात निर्णय घेतला आहे. प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी अनेक शासकीय संस्थांना अधिकार दिले आहे. परंतु कुठलीच संस्था प्लास्टिकबंदीला गांभीर्याने घेत नसल्याने मार्केटमध्ये सर्रास प्लास्टिकची खरेदी-विक्री सुरू आहे.डम्पिंग यार्डमध्ये वाढतोय कचराशहरातून गोळा होणारा कचरा भांडेवाडीत साठविण्यात येतो. मनपाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हंजर या कंपनीला नियुक्त केले होते. कंपनीने येथे मोठा प्लांट टाकला. ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे टार्गेट होते. परंतु २०१२ मध्ये या प्लांटमध्ये आग लागली. तेव्हापासून हा प्लांट ठप्प पडला आहे. त्यामुळे भांडेवाडीत कचऱ्याचे ढिगारे वाढत आहेत. दररोज वाढता कचरा हा शहरासाठी खरोखरच धोकादायक आहे. कचऱ्यामुळे नागपूर शहराचा ५ ते ७ किलोमीटरचा परिसर सध्या बाधित होत आहे. प्रशासनासाठी हा कचरा भविष्यात एक आव्हान ठरणार आहे. कचरा असाच वाढत गेला तर त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीसारख्या निर्णयावर परिणामकारक अंमलबजावणी व कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या बाबतीत प्रशासनाने लक्ष वेधणे गरजेचे आहे.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नnagpurनागपूर