शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ईपीएफमधून ४,५६५ कोटींहून अधिक रक्कम विड्रॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST

नागपूर : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केल्यावर दिनांक २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या काळामध्ये देशभरातील ...

नागपूर : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केल्यावर दिनांक २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या काळामध्ये देशभरातील कर्मचारी भविष्य निधी खात्यांमधून ४,५६५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. यासोबतच गरीब कल्याण योजनेंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळामध्ये २,९९४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम या खात्यामधून काढण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या आस्थापनांनी लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलेला नसल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे.

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयाकडे या संदर्भात माहिती मागितली असता, ही आकडेवारी अलिकडेच पुढे आली आहे. देशात गतवर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर या काळातील उपजीविकेसाठी केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी खात्यामधून रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली होती. या २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० काळात देशभरातील १५ लाख ४६ हजार ३५५ खातेदारांनी दावे सादर केले होते. त्यापोटी ४,५६५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली तर गरीब कल्याण योजनेंतर्गत देशभरातून ११ लाख ८० हजार ६८९ दावे सादर झाले होते, त्यापोटी २,९९४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळामध्ये किती आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफ रक्कम जमा केली आणि ती जमा न करणाऱ्या किती आस्थापनांवर फौजदारी कारवाई केली, याचीही माहिती मागवली होती. राज्यातील बहुतेक ठिकाणच्या अनेक आस्थापनांनी ही रक्कम भरलीच नसल्याचे यातून उघड झाले आहे. मात्र, कारवाई नाममात्र झाल्याचे दिसत आहे.

नागपुरातील आस्थापनांची माहिती नील

नागपुरातील किती आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफची रक्कम भरली, याची माहितीच नागपुरातील कार्यालयाकडे उपलब्ध नाही. दिनांक १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या काळातील अशी माहिती कार्यालयाकडे तयार नसल्याचे उत्तर नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही माहिती उपलब्ध नसल्याने कोणत्याही आस्थापनेवर फौजदारी कारवाई केली नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.

...