शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ईपीएफमधून ४,५६५ कोटींहून अधिक रक्कम विड्रॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST

नागपूर : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केल्यावर दिनांक २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या काळामध्ये देशभरातील ...

नागपूर : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केल्यावर दिनांक २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या काळामध्ये देशभरातील कर्मचारी भविष्य निधी खात्यांमधून ४,५६५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. यासोबतच गरीब कल्याण योजनेंतर्गत १ एप्रिल २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळामध्ये २,९९४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम या खात्यामधून काढण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणच्या आस्थापनांनी लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलेला नसल्याची बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे.

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयाकडे या संदर्भात माहिती मागितली असता, ही आकडेवारी अलिकडेच पुढे आली आहे. देशात गतवर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर या काळातील उपजीविकेसाठी केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी खात्यामधून रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली होती. या २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० काळात देशभरातील १५ लाख ४६ हजार ३५५ खातेदारांनी दावे सादर केले होते. त्यापोटी ४,५६५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली तर गरीब कल्याण योजनेंतर्गत देशभरातून ११ लाख ८० हजार ६८९ दावे सादर झाले होते, त्यापोटी २,९९४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळामध्ये किती आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफ रक्कम जमा केली आणि ती जमा न करणाऱ्या किती आस्थापनांवर फौजदारी कारवाई केली, याचीही माहिती मागवली होती. राज्यातील बहुतेक ठिकाणच्या अनेक आस्थापनांनी ही रक्कम भरलीच नसल्याचे यातून उघड झाले आहे. मात्र, कारवाई नाममात्र झाल्याचे दिसत आहे.

नागपुरातील आस्थापनांची माहिती नील

नागपुरातील किती आस्थापनांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफची रक्कम भरली, याची माहितीच नागपुरातील कार्यालयाकडे उपलब्ध नाही. दिनांक १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या काळातील अशी माहिती कार्यालयाकडे तयार नसल्याचे उत्तर नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसूचना अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही माहिती उपलब्ध नसल्याने कोणत्याही आस्थापनेवर फौजदारी कारवाई केली नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.

...