शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 11:45 IST

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे.  अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर घोटाळ्याचे आरोप करत टीका केली.  

'महाराष्ट्रात भविष्यात राजकीय परिवर्तन मोठ्या होणार आहेत. या संदर्भात पाऊलं पडत आहेत, शिवसेनेच्या नेतृत्वात ही क्रांती होणार आहे. समाजातील राजकीय घटक एकत्र येत आहेत, वंचित बहुजन आघाडीचाही यात समावेश आहे. या संदर्भातील माहिती तुम्हाला पक्ष  प्रमुख देतील, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. ( Winter Session Maharashtra)

राज ठाकरेंच्या खुर्चीमागे वसंत मोरे; 'त्या' किस्स्याची पुण्यात रंगली चर्चा

मुंबईत सर्व देश सामावला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईती कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत, मुंबईत बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील लोक राहतात, सर्वजण शांततेत राहतात, त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत. तसे सीमाभागात होते का? सीमाभागात गेली 75 वर्षे मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे आधी सीमाभाग केंद्रशासीत होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारमधील फक्त शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. सगळी प्रकरणे गंभीर आहेत, काही लोक म्हणत आहेत कुठे बॉम्ब फुटतोय, हे काय आहे. हे फक्त टोकन आहेत अजून मोठे बॉम्ब आहेत. एनआयटी घोटाळा, संजय राठोड यांचा जमिनीचा भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शनगिरी, उद्योगमंत्र्यांच प्रकरण, अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. ही प्रकरणे आम्हाला देणारे तुमचे सहकारी आहेत, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. 

हा भ्रष्टाचाराचा वेताळ घेऊन फिरण देवेंद्र फडणवीस यांना ओझ झाले असेल, महाराष्ट्रात भाजप बदनाम होत आहे. महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांनी चालवलेले हे सरकार आहे. ४० आमदार आणि मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. 

हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, या सरकारमध्ये प्रमाणीकपणा नाही.  हे ४० आमदार अपात्र ठरणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांना सभागृहात बोलू दिले जात नाही. विधानसभा अध्यक्ष पक्षपातपणा करत आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन