शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 11:45 IST

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे.  अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर घोटाळ्याचे आरोप करत टीका केली.  

'महाराष्ट्रात भविष्यात राजकीय परिवर्तन मोठ्या होणार आहेत. या संदर्भात पाऊलं पडत आहेत, शिवसेनेच्या नेतृत्वात ही क्रांती होणार आहे. समाजातील राजकीय घटक एकत्र येत आहेत, वंचित बहुजन आघाडीचाही यात समावेश आहे. या संदर्भातील माहिती तुम्हाला पक्ष  प्रमुख देतील, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. ( Winter Session Maharashtra)

राज ठाकरेंच्या खुर्चीमागे वसंत मोरे; 'त्या' किस्स्याची पुण्यात रंगली चर्चा

मुंबईत सर्व देश सामावला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईती कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत, मुंबईत बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील लोक राहतात, सर्वजण शांततेत राहतात, त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत. तसे सीमाभागात होते का? सीमाभागात गेली 75 वर्षे मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे आधी सीमाभाग केंद्रशासीत होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारमधील फक्त शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. सगळी प्रकरणे गंभीर आहेत, काही लोक म्हणत आहेत कुठे बॉम्ब फुटतोय, हे काय आहे. हे फक्त टोकन आहेत अजून मोठे बॉम्ब आहेत. एनआयटी घोटाळा, संजय राठोड यांचा जमिनीचा भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शनगिरी, उद्योगमंत्र्यांच प्रकरण, अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. ही प्रकरणे आम्हाला देणारे तुमचे सहकारी आहेत, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. 

हा भ्रष्टाचाराचा वेताळ घेऊन फिरण देवेंद्र फडणवीस यांना ओझ झाले असेल, महाराष्ट्रात भाजप बदनाम होत आहे. महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांनी चालवलेले हे सरकार आहे. ४० आमदार आणि मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. 

हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, या सरकारमध्ये प्रमाणीकपणा नाही.  हे ४० आमदार अपात्र ठरणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांना सभागृहात बोलू दिले जात नाही. विधानसभा अध्यक्ष पक्षपातपणा करत आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन