शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 06:24 IST

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत.

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत. तिसरे इंजिन जोडल्यानंतर या सरकारमध्ये अडचणी वाढल्याचे सरकारकडे पाहिल्यावर दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान बोलताना केली.

राज्यात तीव्र दुष्काळ असताना अर्धवट दुष्काळ जाहीर केला. सरकारचे मंत्री इतर राज्यांत प्रचारात गुंतले होते, इथे आपला संसार फाटायला निघाला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्या राज्याचा संसार थाटायला गेले, अशी बोचरी टीका पाटील यांनी यावेळी बोलताना केली. आधी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले, आता तर निर्यातीवर बंदी आणली, टाटा-बिर्लांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर कधी बंद आणत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाढू द्यायचे नाही हे या सरकारचे धोरण आहे.

अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरच्या शेतीचे नुकसान झाले. तरी सरकार अजून पूर्णपणे ग्राऊंडवर उतरले नाही. सरकारने आतापर्यंत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून मदत वाटायला सुरुवात करायला हवी होती, पण राज्य सरकारकडे अजून आकडेवारीच नाही म्हणून कुणाला किती मदत द्यायची हे सरकारला कळत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन