शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 06:24 IST

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत.

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत. तिसरे इंजिन जोडल्यानंतर या सरकारमध्ये अडचणी वाढल्याचे सरकारकडे पाहिल्यावर दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान बोलताना केली.

राज्यात तीव्र दुष्काळ असताना अर्धवट दुष्काळ जाहीर केला. सरकारचे मंत्री इतर राज्यांत प्रचारात गुंतले होते, इथे आपला संसार फाटायला निघाला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्या राज्याचा संसार थाटायला गेले, अशी बोचरी टीका पाटील यांनी यावेळी बोलताना केली. आधी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले, आता तर निर्यातीवर बंदी आणली, टाटा-बिर्लांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर कधी बंद आणत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाढू द्यायचे नाही हे या सरकारचे धोरण आहे.

अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरच्या शेतीचे नुकसान झाले. तरी सरकार अजून पूर्णपणे ग्राऊंडवर उतरले नाही. सरकारने आतापर्यंत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून मदत वाटायला सुरुवात करायला हवी होती, पण राज्य सरकारकडे अजून आकडेवारीच नाही म्हणून कुणाला किती मदत द्यायची हे सरकारला कळत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन