शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जयंत पाटील म्हणाले, हे ट्रिपल इंजिन नव्हे, तर ट्रबल सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 06:24 IST

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत.

राज्यातील ट्रिपल इंजिनचे सरकार अधिक वेगाने चालेल अशी अपेक्षा होती, पण ट्रिपल इंजिनमुळे ट्रबल वाढले आहेत. तिसरे इंजिन जोडल्यानंतर या सरकारमध्ये अडचणी वाढल्याचे सरकारकडे पाहिल्यावर दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान बोलताना केली.

राज्यात तीव्र दुष्काळ असताना अर्धवट दुष्काळ जाहीर केला. सरकारचे मंत्री इतर राज्यांत प्रचारात गुंतले होते, इथे आपला संसार फाटायला निघाला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्या राज्याचा संसार थाटायला गेले, अशी बोचरी टीका पाटील यांनी यावेळी बोलताना केली. आधी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले, आता तर निर्यातीवर बंदी आणली, टाटा-बिर्लांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर कधी बंद आणत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाढू द्यायचे नाही हे या सरकारचे धोरण आहे.

अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरच्या शेतीचे नुकसान झाले. तरी सरकार अजून पूर्णपणे ग्राऊंडवर उतरले नाही. सरकारने आतापर्यंत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करून मदत वाटायला सुरुवात करायला हवी होती, पण राज्य सरकारकडे अजून आकडेवारीच नाही म्हणून कुणाला किती मदत द्यायची हे सरकारला कळत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन