शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू'; चहापान बहिष्कारावरुन फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 18:52 IST

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

नागपूर- राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली. आज विरोधी पक्षांनी चहापान कामांवर बहिष्कार टाकला. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला पाहिजे, विरोधकांना विदर्भ, मराठवाड्याशी काहीही संबंध नाही हे त्यांच्या भूमिकेवरुन दिसते, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

"पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित"; अमित शहांची मोठी घोषणादेवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या राज्याची अर्थव्यवस्था १६ लाख कोटींवरुन ३५ लाख कोटीवरुन गेली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बॅलन्सड आहे. आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेले आहेत, ते आम्ही बघितलं,  त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 

"क्राइम रेटमध्ये महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे याच प्रशिक्षण विरोधी पक्षांना द्यायला पाहिजे, आम्ही येताना काही बॅनर लागलेले बघितले की दहा दिवसच अधिवेशन, आता ज्यांनी नागपूरात अधिवेशनच घेतले नाही, ते आम्हाला हे सांगत आहेत. नागपूरात अधिवेशन घ्यायची वेळ आली की राज्यात कोविड यायचा, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.  सभागृहात सर्व प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, ज्या प्रकारे चर्चा होतील त्या करायला आम्ही तयार आहोत. शेतकऱ्यांचं भल व्हायला पाहिजे यासाठी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, असंही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आता तीन राज्यांमध्ये जो पराभव झाला आहे त्याचे विरोधी पक्ष आत्मपरिक्षण करेल अन्यथा ईव्हीएम मुळे जिंकले, देशात आता दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होतंय अस समाधान यांनी करुन घेतलं आहे, असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे