शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

राजकीय प्रश्न विचाराल, तर उत्तर राजकीयच मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची रोखठोक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 06:33 IST

काँग्रेसने ईव्हीएमवर दोष देण्यापेक्षा पराभवावर आत्मचिंतन करावे. ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली, तेथे ईव्हीएम दोषी आढळले नाही का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विरोधी पक्ष राजकीय दृष्टीने प्रश्न विचारणार असतील, तर त्यांना राजकीयच उत्तर मिळेल, विरोधी पक्ष नेत्यांचे आव्हान स्वीकारून मी त्यांना सभागृहात सर्व प्रश्नांवर उत्तर द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांकडे मांडली.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारने आमच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असे आव्हान दिले आहे, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला सरकार तयार आहे, फक्त त्यांनी राजकीय प्रश्न विचारू नये, विचारल्यास त्यांना राजकीय उत्तर दिले जाईल. हे सरकार ओबीसी लोकांना वापरून फेकून देते, या नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसींकरिता आम्ही जे केले, ते काँग्रेसने कधीच केले नाही. काँग्रेसने वापरून फेकण्याचे राजकारण केले. महायुतीच्या कार्यकाळात २९ अध्यादेश काढण्यात आले. ५२ हॉस्टेल तयार करण्यात आले, नरेंद्र मोदी यांनी तर ओबीसींसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.

मुनगंटीवार यांना मोठी जबाबदारी देणार 

मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश न झाल्यासंदर्भात फडणवीस म्हणाले, यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे, पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने पराभवावर आत्मचिंतन करावे 

काँग्रेसच्या ईव्हीएमविरोधातील मोर्चाबाबत फडणवीस म्हणाले, काँग्रेसने ईव्हीएमवर दोष देण्यापेक्षा पराभवावर आत्मचिंतन करावे. ज्या राज्यात काँग्रेस निवडून आली, तेथे ईव्हीएम दोषी आढळले नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारMahayutiमहायुती