शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खातेवाटप दोन दिवसांत, तीनही मित्रपक्षांचे एकमत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 06:03 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील नवनिर्वाचित सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप येत्या दोन दिवसांत होणार आहे. खात्यांबाबत तीनही मित्रपक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे. दोन दिवसांत उर्वरित बाबींवर निर्णय घेऊन खात्यांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामाचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चांगले काम करणारे मंत्रीच पुढे जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. काही लोकांना संघटनेत जबाबदारी देण्यात येणार असल्याने मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. तर काही लोकांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याने त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झालेला नाही. शिंदेसेना आणि अजित पवार गटाने प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपही असाच निर्णय घेणार आहे का? यासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, भाजप आपल्या स्तरावर मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट करणार आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ देण्यामागे मंत्र्यांना अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल आणि अधिकाधिक लोकांना मंत्रिमंडळात येण्याची संधी मिळेल, हा उद्देश असल्याचे शिंदे आणि पवार यांनी सांगितले. पण याचा अर्थ असा नाही की जे चांगले काम करत नाहीत त्यांनाही बढती मिळेल. काम दाखवा नाही तर घरी जा, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींसाठी तीनशेपट जास्त जागा

लाडक्या बहिणींच्या बळावर प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुती सरकारमध्ये चार महिलांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एवढ्या कमी संख्येने महिलांना संधी का देण्यात आली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील सरकारच्या तुलनेत यंदा लाडक्या भगिनींना तीनशेपटीने जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. भविष्यात लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावांनाच जागा मागण्याची वेळ येणार असल्याचेही ते म्हणाले. 

विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाची माहिती देणारे आज विरोधकांनी सादर केलेले पत्र हे खरे तर गेल्या अधिवेशनाचे पत्र आहे. या पत्रात केवळ ईव्हीएमवरील परिच्छेद जोडण्यात आला आहे. याच कारणावरून पत्रकार परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांनी हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हटले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

बीड प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ 

बीड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. परभणी प्रकरणातही एका मनोरुग्णाने संविधानाच्या शिलालेखाचा अवमान केल्याचे सांगितले. त्याला अटक करण्यात आली आहे. असे असतानाही तेथे असंवैधानिक पद्धतीने अशांतता निर्माण झाली, हे योग्य नाही. छायाचित्र आणि फुटेजमध्ये कैद झालेल्या लोकांवर पोलिस योग्य ती कारवाई करतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती