शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

खातेवाटप दोन दिवसांत, तीनही मित्रपक्षांचे एकमत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 06:03 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील नवनिर्वाचित सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खात्यांचे वाटप येत्या दोन दिवसांत होणार आहे. खात्यांबाबत तीनही मित्रपक्षांमध्ये जवळपास एकमत झाले आहे. दोन दिवसांत उर्वरित बाबींवर निर्णय घेऊन खात्यांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच सर्व मंत्र्यांना त्यांच्या कामाचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. चांगले काम करणारे मंत्रीच पुढे जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. काही लोकांना संघटनेत जबाबदारी देण्यात येणार असल्याने मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. तर काही लोकांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याने त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झालेला नाही. शिंदेसेना आणि अजित पवार गटाने प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मंत्र्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपही असाच निर्णय घेणार आहे का? यासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, भाजप आपल्या स्तरावर मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट करणार आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ देण्यामागे मंत्र्यांना अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल आणि अधिकाधिक लोकांना मंत्रिमंडळात येण्याची संधी मिळेल, हा उद्देश असल्याचे शिंदे आणि पवार यांनी सांगितले. पण याचा अर्थ असा नाही की जे चांगले काम करत नाहीत त्यांनाही बढती मिळेल. काम दाखवा नाही तर घरी जा, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींसाठी तीनशेपट जास्त जागा

लाडक्या बहिणींच्या बळावर प्रचंड बहुमत मिळवलेल्या महायुती सरकारमध्ये चार महिलांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. एवढ्या कमी संख्येने महिलांना संधी का देण्यात आली आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील सरकारच्या तुलनेत यंदा लाडक्या भगिनींना तीनशेपटीने जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. भविष्यात लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावांनाच जागा मागण्याची वेळ येणार असल्याचेही ते म्हणाले. 

विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाची माहिती देणारे आज विरोधकांनी सादर केलेले पत्र हे खरे तर गेल्या अधिवेशनाचे पत्र आहे. या पत्रात केवळ ईव्हीएमवरील परिच्छेद जोडण्यात आला आहे. याच कारणावरून पत्रकार परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांनी हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हटले आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सभागृहात उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे.

बीड प्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ 

बीड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. परभणी प्रकरणातही एका मनोरुग्णाने संविधानाच्या शिलालेखाचा अवमान केल्याचे सांगितले. त्याला अटक करण्यात आली आहे. असे असतानाही तेथे असंवैधानिक पद्धतीने अशांतता निर्माण झाली, हे योग्य नाही. छायाचित्र आणि फुटेजमध्ये कैद झालेल्या लोकांवर पोलिस योग्य ती कारवाई करतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती