शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनाचा प्रत्येक सेकंदाचा खर्च ६५०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 22:37 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. या अधिवेशनावर सहा दिवसात किती खर्च करण्यात आला यासंदर्भात लोकमतने विविध विभागाचा आढावा घेतला असता, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर प्रति सेकंद ६५०० रुपये खर्च आल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देयंदा खर्च कमी झाल्याची माहिती : मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने खर्चात कपात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. सहा दिवसासाठी नागपुरात आलेले सरकार व सरकारचे प्रशासकीय कर्मचारीसुद्धा मुंबईला पोहचले आहे. या अधिवेशनावर सहा दिवसात किती खर्च करण्यात आला यासंदर्भात लोकमतने विविध विभागाचा आढावा घेतला असता, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर प्रति सेकंद ६५०० रुपये खर्च आल्याची माहिती पुढे आली आहे.खर्चावरून अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. ते म्हणताहेत की बिल निघाल्यानंतरच खर्चाचे आकडे समोर येतील. परंतु विधिमंडळाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, गेल्या ६ दिवसात अधिवेशनावर ७५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. प्रत्येक तासात खर्चाचा आढावा घेतला असता १.६२ कोटी रुपये व सेकंदाचा हिशेब केला असता ६५०० रुपये खर्च झाले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, यावर्षी अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याने खर्चात कपात झाली आहे. अन्यथा खर्च १०० कोटीच्या वर झाला असता. विशेष म्हणजे या खर्चात कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे डीए, टीए यांचा समावेश नाही. कारण हे त्या त्या विभागाशी संबंधित आहे.प्रश्नोत्तराचा तास नाही, विधानसभेत लक्षवेधीही नाहीविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ६ दिवस चालले. विधानसभेचे कामकाज ४७ तास २९ मिनिट कामकाज झाले तर विधान परिषदेचे कामकाज ३४ तास ३९ मिनिट झाले. दोन्ही सभागृहाच्या कामकाजात प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. विधानसभेत लक्षवेधी पुकारण्यात आल्या नाही. तसे १०५७ लक्षवेधी प्रस्तावाची नोटीस मिळाली. ७१ स्वीकृत झाल्या. ३ लक्षवेधीला कामकाजात स्थान मिळाले. परंतु एकाही लक्षवेधीवर चर्चा झाली नाही. तिकडे विधान परिषदेत लक्षवेधीचे ५०९ प्रस्ताव आले. ज्यात १३९ स्वीकारण्यात आले. ३० लक्षवेधीवर चर्चा झाली. परंतु विधानसभा सदस्यांना लक्षवेधीवर आपले मत मांडण्याची संधी मिळाली नाही.पीडब्ल्यूडीने केली नाही अतिरिक्त मागणी१६ ते २१ डिसेंबर दरम्यान चाललेल्या हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) १० कोटी रुपये निधी देण्यात आला होता. पीडब्ल्यूडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दरवर्षी अधिवेशनाच्या सुरवातीला एवढाच निधी देण्यात येतो. पण विभागाकडून पुन्हा निधीची मागणी करण्यात येते. परंतु यावर्षी अधिवेशन ६ दिवस चालल्याने खर्च सुद्धा कमी झाला. त्यामुळे अतिरिक्त रकमेची मागणी करण्यात आली नाही. सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, ८ कोटी रुपयेच खर्च झाले आहे. अनेक कामाचे बिल अजूनही आले नाही. बिलांचे वाटप केल्यानंतर रक्कम १० कोटी रुपये जाण्याची शक्यता आहे.पूर्ण हिशेब येण्यास आठ दिवसपीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांचे म्हणणे आहे की, विभागाने अजूनही अंतिम हिशेब केलेला नाही. बऱ्याच कामाचे बिल एजन्सीकडून अद्यापही यायचे आहे. येत्या आठ दिवसात झालेल्या सर्व खर्चाचा हिशेब पुढे येईल.का कमी झाला खर्च?राज्य मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्री आहे. अशात रविभवनमध्ये केवळ सहा मंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे नागभवन सुद्धा रिकामे पडले होते. पीडब्ल्यूडीला यावर्षी निवासावर कमी खर्च करावा लागला. खर्च कमी होण्याला सर्वात महत्त्वाचे कारण अधिवेशनाचा अवधी आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर