शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.च्या कमी पटसंख्येच्या साडेतीनशे शाळा बंद होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:12 IST

विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात : शिक्षक समितीचा सरकारला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक निर्धारणाबाबतच्या शासन निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या ३५० शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण यामुळे धोक्यात आले असून, हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देत हा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लोकप्रतिनिधींना दिले निवेदनशासन निर्णयाविरोधात शिक्षक समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार मोहन मते, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, अॅड. अभिजित वंजारी व कृपाल तुमाने यांना निवेदने दिली आहेत.

एक लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यातया शासन निर्णयामुळे राज्यभरातील अंदाजे एक लाख विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्याची शक्यता आहे. विशेषतः इयत्ता ६ वी ते ८ वीच्या वर्गांसाठी पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये शिक्षक मंजूर केले जाणार नाहीत. परिणामी, या शाळांमधील वर्ग बंद पडण्याचा धोका आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुमारे ३५० शाळांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. राज्यभरातील परिस्थितीही अशीच गंभीर आहे.

शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यातया निर्णयामुळे राज्यात तब्बल २५ हजारांहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरतील. नवीन संचमान्यतेच्या अटींमुळे या शाळांवर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिष्टमंडळातील प्रमुख सदस्यशिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लिलाधर ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात अनिल नासरे, विलास काळमेघ, नीळकंठ लोहकरे, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, प्रकाश सव्वालाखे, सुरेंद्र कोल्हे, विजय उमक, दिगांबर ठाकरे, धर्मेंद्र गिरडकर, दामोदर कोपरकर, संजय आवारी, विजय जाधव, मोरेश्वर तुपे, राकेश ढोरे, योगेश राऊत, सुरेश भोसकर, प्रकाश जाधव, दिलीप मेहर, किशोर बांगरे आणि चिंधू शंभरकर आर्दीचा समावेश होता.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूरEducationशिक्षण