शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; संतुलित विकास करणार : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:21 IST

विदर्भ, मराठवाडा, कोकणसह राज्याचा संतुलित विकास आपले सरकार करेल.

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पूर्तता महायुती सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत दिली. विदर्भ, मराठवाडा, कोकणसह राज्याचा संतुलित विकास आपले सरकार करेल. आधीच्या महायुती सरकारमधील लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी पुढेही सुरू राहील. विदर्भात गेल्या दोन वर्षांत १.२३ लाख कोटी रुपयांची तर मराठवाड्यात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, असे ते म्हणाले.

मराठवाडा वॉटर ग्रीड साकार होणार 

मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना निश्चितपणे साकारली जाईल. आपल्या आधीच्या सरकारने ही योजना बनविली होती; पण महाविकास आघाडी सरकारने त्याचा प्रस्तावच केंद्राकडे पाठविला नाही. आता आमच्या सरकारने त्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. या योजनेमुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची मिटेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही मिळणार २० हजार रुपये बोनस 

महायुती सरकारने गेल्यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना २० हजार रुपये बोनस दिला होता, यावर्षीही २० हजार रुपये दिले जातील अशी घोषणा फडणवीस यांनी केली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर धान खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. कापूस आणि सोयाबीनची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. संत्रा उत्पादकांना १६५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, मोर्शी, कळमेश्वर आणि बुलडाणा येथे संत्रा प्रक्रिया केंद्रांची उभारणी केली जाईल, असे ते म्हणाले.

कोणकोणत्या घोषणा केल्या मुख्यमंत्र्यांनी? 

गोसी खुर्द सिंचन प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करणार, जल आणि वन पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय सुविधा तेथे उभारणार. 

विदर्भात वैनगंगा-पैनगंगा- नळगंगा नदीजोड योजनेची निविदा जारी, १० लाख हेक्टरचे सिंचन होणार. या योजनेत ५५० किलोमीटरची नवीन नदी विकसित होणार.

विदर्भातील ११० सिंचन प्रकल्पांना मंजुरी, ६१ कामे पूर्ण 

मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्यासाठी पुरेसा निधी देणार. 

अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक होणार.

गडचिरोलीत साकारणार विमानतळ 

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद येत्या तीन वर्षांत संपविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आणला आहे. दक्षिण गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा सर्वांत मोठा नेता गिरधर याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. १५०० स्थानिक युवक पोलिस दलात नोकरीला लागले आहेत. गडचिरोलीचा विकास देशाची सर्वांत मोठी स्टील सिटी म्हणून केला जाईल. त्यात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. गडचिरोलीत विमानतळाची उभारणीही केली जाईल.

ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग होणारच 

पुण्याच्या शिरुरपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा ग्रीनफिल्ड दुतगती मार्ग कोणत्याही परिस्थितीत उभारला जाईल, त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. मनमाड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरी मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सूप वाजले, ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

हिवाळी अधिवेशन शनिवारी संपले. विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात याची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून मुंबईत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर करण्यात आली. विधानसभेत ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले. सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८७.८० टक्के होती, तर सरासरी उपस्थिती ७२,९० टक्के होती. विधान परिषदेत ३६ तास कामकाज झाले. अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८७.७६ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७९.३० टक्के इतकी होती. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ