शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

महाराजबाग बंद होऊ देणार नाही : नागपूरकरांची संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 20:55 IST

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे महाराजबागमध्ये पालन होत नसल्यामुळे महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राधिकरणाने घेतला. यासंदर्भातील मेल महाराजबाग प्राधिकरणाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. महाराजबाग प्राधिकरणानुसार वेळोवेळी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आहे. पण प्राधिकरणाकडून त्याला मंजुरी न देता, मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद होणार, अशी चर्चा आज अख्ख्या शहरात होती. नागपूरकरांनी त्यावर संताप व्यक्त करून, महाराजबाग बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने केली मान्यता रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे महाराजबागमध्ये पालन होत नसल्यामुळे महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राधिकरणाने घेतला. यासंदर्भातील मेल महाराजबाग प्राधिकरणाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. महाराजबाग प्राधिकरणानुसार वेळोवेळी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आहे. पण प्राधिकरणाकडून त्याला मंजुरी न देता, मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद होणार, अशी चर्चा आज अख्ख्या शहरात होती. नागपूरकरांनी त्यावर संताप व्यक्त करून, महाराजबाग बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता रद्द करण्यासंदर्भात काही निकष पूर्ण केले नसल्याचे सांगितले आहे. यामध्ये योगासन वर्ग, मॉर्निंग वॉक, बालोद्यान वेगळे करावे, संरक्षण भिंत बांधण्यात यावी, प्लास्टिक बॅगवर प्रतिबंध, रिक्त पदे, पिंजऱ्याचे नवीनीकरण, विना परवाना वन्यप्राण्यांना मुक्त करणे, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी आदी कारणे देण्यात आली आहेत. महाराजबाग हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित आहे. या महाराजबागेतील प्राण्यांची देखरेख प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर बघतात. यासंदर्भात डॉ. बावस्कर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार महाराजबागेच्या विकास कार्यासाठी २०११ मध्ये ‘मास्टर प्लॅन’ तयार करून केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविला. त्यानंतर त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना महाराजबाग प्राधिकरणाला दिल्या. त्यानुसार २०१२, २०१४ व २०१६ मध्ये पुन्हा सुधारित प्लॅन केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविला. परंतु त्यालाही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे केंद्रीय प्राधिकरणाच्या निकषानुसार विकास कामे होऊ शकली नाही. फेब्रुवारी २०१८ मध्ये महाराजबागेचा ले-आऊट प्लॅन मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मे २०१८ मध्ये प्राधिकरणाने घेतलेल्या सुनावणीत ही बाब आम्ही प्राधिकरणाकडे मांडली. त्यांनी लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. पण आता मान्यता रद्द करण्याचा मेल धडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात प्राणिसंग्रहालय नियंत्रक एन.डी. पार्लावार यांना विचारणा केली असता, त्यांनी बैठकीत असल्याचे सांगून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.महाराजबाग बंद होणार हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर लोकमतने महाराजबागेत येणाऱ्या लोकांचा आढावा घेतला. अनेकांनी केंद्रीय प्राधिकरणावर संताप व्यक्त केला. छोट्या-छोट्या बाबीमुळे महाराजबाग बंद करू नये, अशी भावना व्यक्त केली. महाराजबाग वाचविण्यासाठी काही संघटना नेहमीच पुढाकार घेतात. या संघटनांनी महाराजबाग बंद होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.वेळ पडल्यास आंदोलन करूमहाराजबाग नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. मुख्यमंत्र्यांचे काका शंकरराव फडणवीस यांनी महाराजबाग प्रभात मित्र मंडळाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी महाराजबाग वाचविण्यासाठी संघर्ष केला होता. महाराजबाग हे नागपूरचे हृदयस्थळ आहे. अशा महाराजबागेची मान्यता रद्द करण्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाने घेतलेला निर्णय योग्य नाही. उमेशबाबू चौबे मित्र मंडळ ते होऊ देणार नाही. आम्ही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती करू, वेळ पडल्यास आंदोलनसुद्धा करू.दिलीप नरवडिया, सदस्य, उमेशबाबू चौबे मित्र मंडळगरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊमहाराजबाग नागपूर शहराचे वैभव आहे. निसर्गाचा आनंदासोबत वन्यप्राणीही येथे बघायला मिळतात. केंद्रीय प्राधिकरणाचे काही नियम आहेत. ते पीकेव्हीने पूर्ण करावे, त्यासाठी प्रयत्न करावे, केंद्रीय प्राधिकरणाने त्यासाठी निधी द्यावा. पण महाराजबाग बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही होऊ देणार नाही. प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू, तिथे दाद न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे.अ‍ॅड. प्रमोद नरड, अध्यक्ष, आरोग्य आसन मंडळनागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भाच्या दृष्टिकोनातून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले अतिशय सुंदर स्थळ महाराजबाग आहे. शेकडो वर्षांपासून महाराजबाग सुरू आहे. अविस्मरणीय वातावरण आहे. शहराचे असे हे हृदयस्थळ बंद होणे योग्य नाही. शहरातील स्थानिक राजकारण्यांनीसुद्धा हे स्थळ बंद होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे.प्रसाद देशपांडे, नागरिकबालपणापासून महाराजबागेत येतो आहे. आज नातवाला घेऊन आलो आहे. महाराजबाग ब्युटी आॅफ सिटी आहे. नागपूरची ओळख आहे. जे कुणी बंद करीत असेल, त्याला संपूर्ण नागपुरातून विरोध व्हायला हवा.सुधाकर चुरे, नागरिकलहान मुलांसाठी महाराजबाग आनंदवन आहे. खेळायला-बागडायला भरपूर खेळणी आहेत. फिश अ‍ॅक्वारियम आकर्षक आहे. सोबत वाघ, अस्वल, शहामृग, मगर हे प्राणी आम्हाला बघायला मिळत आहे. हे प्राणिसंग्रहालय कधीच बंद होऊ नये.मधुरा रेवतकर, विद्यार्थिनीआम्ही वेळोवेळी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला आमच्या अडचणी, त्यांचे निकष यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. त्यांच्याकडून मास्टर प्लॅनला मंजुरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. असे असतानाही त्यांनी मान्यता रद्द करण्यासंदर्भात पाठविलेला मेल लक्षात घेता, आम्ही केंद्र शासनाकडे अपील करणार आहोत.डॉ. सुनील बावस्कर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणिसंग्रहालयअसे आहे महाराजबाग 

  • १९०६ मध्ये नागपूर कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर, या प्राणी संग्रहालयाचे हस्तांतरण विद्यापीठाकडे करण्यात आले़
  • भोसल्यांचा शिकारखाना म्हणून महाराजबाग प्राणी संग्रहालय ओळखले जाते.
  • भोसल्यांच्या पराभवानंतर इंग्रजांनी हा शिकारखाना ताब्यात घेतला आणि त्याचे नामकरण महाराजबाग प्राणी संग्रहालय असे केले.
  • कृषी विद्यापीठाद्वारे कोणतेही सरकारी अनुदान न घेता केवळ नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तिकीट शुल्कातूनच महाराजबागेचे संचालन सुरू आहे.
  • नागपूर शहराच्या मध्यभागी असणारे हे एकमेव हिरवळ स्थान असल्यानेही नागरिकांमध्ये या स्थळाविषयी आस्थेची भावना आहे़
  • विदर्भातील हे एकमेव प्राणी संग्रहालय असून याला यंदा १२५ वर्षे पूर्ण होत आहे.
  • प्राणी संग्रहालय दहा हेक्टरमध्ये पसरले असून येथे २१ प्रजातींचे ३००हून अधिक जंगली पशू-पक्षी वास्तव्यास आहेत़.