शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नागपुरातील वैभव मोतीबाग डिझेल लोकोशेड बंद होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:54 IST

अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकामगारांना पाठविताहेत इतरत्र : ब्रॉडगेज इंजिनचे काम सुरू करण्याची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.भारतीय रेल्वेत सर्वत्र नॅरोगेज होते. आधुनिक काळात नॅरोगेजऐवजी आता सर्वत्र ब्रॉडगेज मार्ग होत आहेत. कधी काळी वाफेवर चालणारे इंजिन, त्यानंतर डिझेल आणि आता विजेवर धावणारे इंजिन वापरण्यात येत आहे. त्यामुळे डिझेल इंजिन मागे पडत आहेत. नागपूर विभागात नॅरोगेज आणि डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात असल्याने मोतीबाग डिझेल लोकोशेड सुरू झाले. येथे नॅरोगेज इंजिनच्या देखभाल-दुरुस्तीची कामे व्हायची. काळाच्या ओघात नॅरोगेज रेल्वे इतिहासजमा झाली. त्यामुळे मोतीबाग शेडला उतरती कळा लागली. आता केवळ नागपूर-नागभीड हा एकच नॅरोगेज मार्ग शिल्लक आहे. लोकोशेडमधील काम कमी झाल्याने २०१५-१६ मध्ये कोट्यवधींचा खर्च करून ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. शेडला २५ ब्रॉडगेज डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीची मान्यता असून, हळूहळू शेडची क्षमता ४० लोकोपर्यंत नेण्याची ग्वाही देण्यात आली होती. येथे इलेक्ट्रिक, मेकॅनिक, स्टोअर, व्यवस्थापन हे विभाग असले तरी कामगारांची संख्या केवळ २५० वर आली आहे. आज महिन्याकाठी सरासरी केवळ ११ नॅरोगेज इंजिन आणि १४ ब्रॉडगेजचीच देखभाल-दुरुस्ती होत आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविले जात आहे. त्याविरोधात कामगारांनी आंदोलनही उभारले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी शेड बंद होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली होती. परंतु आता मोतीबाग लोकोशेडमधील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत असल्यामुळे हे लोकोशेड बंद होणार की काय, अशी चर्चा होत आहे.कामगारांची बदलीमोतीबाग लोकोशेडमध्ये १० ते १५ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या कामगारांना अपग्रेड करून त्यांची गोंदियाला बदली करण्यात आली आहे. महिनाभरात नवीन जागी रुजू व्हा, अन्यथा बढती रद्द करण्यात येईल, असा इशारासुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याची माहिती आहे.

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारी