शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2023 08:00 IST

Nagpur News परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : यंदा ‘अल्-निनाे’च्या सक्रियतेमुळे पावसावर विपरीत प्रभाव हाेण्याच्या शक्यतेत देशात ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीच्या जवळपास पाऊस हाेण्याची शक्यता नुकतीच हवामान विभागाने व्यक्त केली हाेती. हा भराेसा भारतीय महासागरीय माेसमी पावसामुळे दिला जात आहे; मात्र परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय मान्सून दाेन घटकांवर अवलंबून असते. पॅसिफिक महासागराच्या पाण्याच्या तापमानावरून अधिक पावसासाठी ‘लाॅ-निनाे’ व कमी पावसासाठी ‘अल्-निनाे’चा प्रभाव कारणीभूत ठरताे; मात्र भारतात मान्सूनसाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाच्या घडामाेडी कारणीभूत ठरतात. याच घटकाच्या भरवशावर हवामान विभागाने ‘अल्-निनाे’चा प्रभाव असूनही सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जेव्हा अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या खाडीपेक्षा अधिक असते तेव्हा पावसाची स्थिती अनुकूल असते आणि उलट झाले तर प्रतिकूल असते.

पावसाचे दिवस घटतील का?

हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, यंदा अल्-निनाे जुलै ते ऑगस्टमध्ये सक्रिय हाेण्याची शक्यता परदेशी हवामान एजन्सींनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे, याच काळात माेसमी पाऊस अधिक असताे. यावेळी अल्-निनाे सक्रिय झाला तर पावसावर परिणाम हाेईल. गेल्या काही वर्षांत मान्सूनचे आगमन उशिरा हाेत आहे. यावेळीही असे झाले तर पावसाचे दिवस घटण्याची शक्यता आहे. ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ म्हणजे इंडियन ओशन डायपाेल (आयओडी) लवकर विकसित झाला तर परिस्थिती अनुकूल ठरेल; मात्र बऱ्याच वेळा आयओडी हंगामाच्या उत्तरार्धात अवतरला आहे. असे झाले तर चिंता वाढण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

२० वर्षांत ७ वेळा दुष्काळी स्थिती

परदेशी एजन्सीनुसार येणाऱ्या पावसाळ्यात अल्-निनोची शक्यता ८० टक्के वाढली आहे. म्हणजेच अल्-निनोमुळे पावसाची शक्यता देशात सरासरीपेक्षा कमी असू शकते. तज्ज्ञांच्या मते अल्-निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० अशा २० वर्षांत २००३, २००५, २००९, २०१०, २०१५, २०१६, २०१७ अशा ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले. या ७ वर्षांत खरिपात पिकांना झळ बसून उत्पादन कमी झाले आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती असेल?

हवामान विभागाच्या भाकितानुसार महाराष्ट्रात जर तो सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९५ टक्के पडण्याचीच शक्यता वर्तविली आहे. कमकुवत मान्सूनचा रेटा राज्यातही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेतीसाठी दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत परिस्थिती पाहून कमी पाऊस लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे. शिवाय पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोत आपत्ती स्थितीसाठी राखीव ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :weatherहवामान