शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2023 08:00 IST

Nagpur News परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : यंदा ‘अल्-निनाे’च्या सक्रियतेमुळे पावसावर विपरीत प्रभाव हाेण्याच्या शक्यतेत देशात ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीच्या जवळपास पाऊस हाेण्याची शक्यता नुकतीच हवामान विभागाने व्यक्त केली हाेती. हा भराेसा भारतीय महासागरीय माेसमी पावसामुळे दिला जात आहे; मात्र परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय मान्सून दाेन घटकांवर अवलंबून असते. पॅसिफिक महासागराच्या पाण्याच्या तापमानावरून अधिक पावसासाठी ‘लाॅ-निनाे’ व कमी पावसासाठी ‘अल्-निनाे’चा प्रभाव कारणीभूत ठरताे; मात्र भारतात मान्सूनसाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाच्या घडामाेडी कारणीभूत ठरतात. याच घटकाच्या भरवशावर हवामान विभागाने ‘अल्-निनाे’चा प्रभाव असूनही सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जेव्हा अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या खाडीपेक्षा अधिक असते तेव्हा पावसाची स्थिती अनुकूल असते आणि उलट झाले तर प्रतिकूल असते.

पावसाचे दिवस घटतील का?

हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, यंदा अल्-निनाे जुलै ते ऑगस्टमध्ये सक्रिय हाेण्याची शक्यता परदेशी हवामान एजन्सींनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे, याच काळात माेसमी पाऊस अधिक असताे. यावेळी अल्-निनाे सक्रिय झाला तर पावसावर परिणाम हाेईल. गेल्या काही वर्षांत मान्सूनचे आगमन उशिरा हाेत आहे. यावेळीही असे झाले तर पावसाचे दिवस घटण्याची शक्यता आहे. ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ म्हणजे इंडियन ओशन डायपाेल (आयओडी) लवकर विकसित झाला तर परिस्थिती अनुकूल ठरेल; मात्र बऱ्याच वेळा आयओडी हंगामाच्या उत्तरार्धात अवतरला आहे. असे झाले तर चिंता वाढण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

२० वर्षांत ७ वेळा दुष्काळी स्थिती

परदेशी एजन्सीनुसार येणाऱ्या पावसाळ्यात अल्-निनोची शक्यता ८० टक्के वाढली आहे. म्हणजेच अल्-निनोमुळे पावसाची शक्यता देशात सरासरीपेक्षा कमी असू शकते. तज्ज्ञांच्या मते अल्-निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० अशा २० वर्षांत २००३, २००५, २००९, २०१०, २०१५, २०१६, २०१७ अशा ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले. या ७ वर्षांत खरिपात पिकांना झळ बसून उत्पादन कमी झाले आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती असेल?

हवामान विभागाच्या भाकितानुसार महाराष्ट्रात जर तो सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९५ टक्के पडण्याचीच शक्यता वर्तविली आहे. कमकुवत मान्सूनचा रेटा राज्यातही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेतीसाठी दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत परिस्थिती पाहून कमी पाऊस लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे. शिवाय पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोत आपत्ती स्थितीसाठी राखीव ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :weatherहवामान