शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2023 08:00 IST

Nagpur News परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : यंदा ‘अल्-निनाे’च्या सक्रियतेमुळे पावसावर विपरीत प्रभाव हाेण्याच्या शक्यतेत देशात ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीच्या जवळपास पाऊस हाेण्याची शक्यता नुकतीच हवामान विभागाने व्यक्त केली हाेती. हा भराेसा भारतीय महासागरीय माेसमी पावसामुळे दिला जात आहे; मात्र परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय मान्सून दाेन घटकांवर अवलंबून असते. पॅसिफिक महासागराच्या पाण्याच्या तापमानावरून अधिक पावसासाठी ‘लाॅ-निनाे’ व कमी पावसासाठी ‘अल्-निनाे’चा प्रभाव कारणीभूत ठरताे; मात्र भारतात मान्सूनसाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाच्या घडामाेडी कारणीभूत ठरतात. याच घटकाच्या भरवशावर हवामान विभागाने ‘अल्-निनाे’चा प्रभाव असूनही सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जेव्हा अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या खाडीपेक्षा अधिक असते तेव्हा पावसाची स्थिती अनुकूल असते आणि उलट झाले तर प्रतिकूल असते.

पावसाचे दिवस घटतील का?

हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, यंदा अल्-निनाे जुलै ते ऑगस्टमध्ये सक्रिय हाेण्याची शक्यता परदेशी हवामान एजन्सींनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे, याच काळात माेसमी पाऊस अधिक असताे. यावेळी अल्-निनाे सक्रिय झाला तर पावसावर परिणाम हाेईल. गेल्या काही वर्षांत मान्सूनचे आगमन उशिरा हाेत आहे. यावेळीही असे झाले तर पावसाचे दिवस घटण्याची शक्यता आहे. ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ म्हणजे इंडियन ओशन डायपाेल (आयओडी) लवकर विकसित झाला तर परिस्थिती अनुकूल ठरेल; मात्र बऱ्याच वेळा आयओडी हंगामाच्या उत्तरार्धात अवतरला आहे. असे झाले तर चिंता वाढण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

२० वर्षांत ७ वेळा दुष्काळी स्थिती

परदेशी एजन्सीनुसार येणाऱ्या पावसाळ्यात अल्-निनोची शक्यता ८० टक्के वाढली आहे. म्हणजेच अल्-निनोमुळे पावसाची शक्यता देशात सरासरीपेक्षा कमी असू शकते. तज्ज्ञांच्या मते अल्-निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० अशा २० वर्षांत २००३, २००५, २००९, २०१०, २०१५, २०१६, २०१७ अशा ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले. या ७ वर्षांत खरिपात पिकांना झळ बसून उत्पादन कमी झाले आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती असेल?

हवामान विभागाच्या भाकितानुसार महाराष्ट्रात जर तो सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९५ टक्के पडण्याचीच शक्यता वर्तविली आहे. कमकुवत मान्सूनचा रेटा राज्यातही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेतीसाठी दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत परिस्थिती पाहून कमी पाऊस लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे. शिवाय पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोत आपत्ती स्थितीसाठी राखीव ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :weatherहवामान