शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2023 08:00 IST

Nagpur News परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : यंदा ‘अल्-निनाे’च्या सक्रियतेमुळे पावसावर विपरीत प्रभाव हाेण्याच्या शक्यतेत देशात ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीच्या जवळपास पाऊस हाेण्याची शक्यता नुकतीच हवामान विभागाने व्यक्त केली हाेती. हा भराेसा भारतीय महासागरीय माेसमी पावसामुळे दिला जात आहे; मात्र परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय मान्सून दाेन घटकांवर अवलंबून असते. पॅसिफिक महासागराच्या पाण्याच्या तापमानावरून अधिक पावसासाठी ‘लाॅ-निनाे’ व कमी पावसासाठी ‘अल्-निनाे’चा प्रभाव कारणीभूत ठरताे; मात्र भारतात मान्सूनसाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाच्या घडामाेडी कारणीभूत ठरतात. याच घटकाच्या भरवशावर हवामान विभागाने ‘अल्-निनाे’चा प्रभाव असूनही सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जेव्हा अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या खाडीपेक्षा अधिक असते तेव्हा पावसाची स्थिती अनुकूल असते आणि उलट झाले तर प्रतिकूल असते.

पावसाचे दिवस घटतील का?

हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, यंदा अल्-निनाे जुलै ते ऑगस्टमध्ये सक्रिय हाेण्याची शक्यता परदेशी हवामान एजन्सींनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे, याच काळात माेसमी पाऊस अधिक असताे. यावेळी अल्-निनाे सक्रिय झाला तर पावसावर परिणाम हाेईल. गेल्या काही वर्षांत मान्सूनचे आगमन उशिरा हाेत आहे. यावेळीही असे झाले तर पावसाचे दिवस घटण्याची शक्यता आहे. ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ म्हणजे इंडियन ओशन डायपाेल (आयओडी) लवकर विकसित झाला तर परिस्थिती अनुकूल ठरेल; मात्र बऱ्याच वेळा आयओडी हंगामाच्या उत्तरार्धात अवतरला आहे. असे झाले तर चिंता वाढण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

२० वर्षांत ७ वेळा दुष्काळी स्थिती

परदेशी एजन्सीनुसार येणाऱ्या पावसाळ्यात अल्-निनोची शक्यता ८० टक्के वाढली आहे. म्हणजेच अल्-निनोमुळे पावसाची शक्यता देशात सरासरीपेक्षा कमी असू शकते. तज्ज्ञांच्या मते अल्-निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० अशा २० वर्षांत २००३, २००५, २००९, २०१०, २०१५, २०१६, २०१७ अशा ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले. या ७ वर्षांत खरिपात पिकांना झळ बसून उत्पादन कमी झाले आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती असेल?

हवामान विभागाच्या भाकितानुसार महाराष्ट्रात जर तो सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९५ टक्के पडण्याचीच शक्यता वर्तविली आहे. कमकुवत मान्सूनचा रेटा राज्यातही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेतीसाठी दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत परिस्थिती पाहून कमी पाऊस लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे. शिवाय पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोत आपत्ती स्थितीसाठी राखीव ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :weatherहवामान