नासाडी कशासाठी ?
By Admin | Updated: April 25, 2016 02:29 IST2016-04-25T02:29:51+5:302016-04-25T02:29:51+5:30
दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला पाण्याचे खरे महत्त्व कळत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करूनही पाणी मिळणे मुश्किल झालेय....

नासाडी कशासाठी ?
नासाडी कशासाठी ? दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला पाण्याचे खरे महत्त्व कळत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करूनही पाणी मिळणे मुश्किल झालेय. पण आम्हा नागपूरकरांना याचे महत्त्व कधी कळणार हा खरा प्रश्न आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करण्यात येतो. टँकर भरतो आणि संबंधित ठिकाणी पोहोचेपर्यंत रस्त्यानेच पाणी वाया जाते. पाणी मुबलक आहे म्हणून ते व्यर्थ कशाला घालायचे? हे प्रशासनाला सुचेल का!