शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कॅगच्या अहवालात ताशेरे असतानाही गडकरींना ईडी, सीबीआयची नोटीस का नाही? काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: April 15, 2024 18:04 IST

नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

कमलेश वानखेडे, नागपूर : भारतमाला परियोजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. कंत्राटदारांनी कंत्राट मिळविण्यासाठी कागदपत्रांचा आधार घेतला. कॅबीनेट कमिटीच्या मंजुरीशिवाय १ लाख कोटींचे बॉण्ड काढण्यात आले. कॅगने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या मंत्रालयावर आरोप केले आहेत. मग त्यांना ईडी किंवा सीबीआयने नोटीस का पाठविलेली नाही, त्यांना गडकरींचा पत्ता माहीत नाही का, असा सवाल अ. भा. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.

नागपूर येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना खेडा म्हणाले, एनएचआयने घेतलेल्या कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत फक्त व्याजापोटी ३८ हजार कोटी दिले जात आहेत. एनएचआयने बांधलेल्या रस्त्यांच्या किमती सीसीएने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा दुप्पट खर्चात गेल्या आहेत. ‘चंदा दो, धंदा लो’ असे एनएचआयच्या कामातही सुरू असल्याचा आरोप खेडा यांनी केला. यावेळी प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे व सोशल मीडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.

संविधानाला धक्का लावण्याच्या हालचाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील संविधान बदलू शकत नाही, असे सांगितले. पण दुसरीकडे त्यांचे अयोध्येचे खासदार ४०० जागा द्या संविधान बदलू, असे सांगतात. अनंत हेडगे, अरुण गोविल हीच भाषा बोलतात. त्यावर पंतप्रधान मोदी बोलत नाही. यावरून संविधान बदलण्याचा कट रचला जात असल्याचा संशय येतो. भाजप ज्या पद्धतीने ४०० पार जागा मागत आहे. एकदा हुकूमशहाच्या हाती एकतर्फी सत्ता आली तर मग तो काहीच विचार करीत नाही, अशी टीकाही खेडा यांनी केली.

-गॅरंटी शब्द काँग्रेसपासून चोरला

भाजपने गॅरंटी हा शब्द काँग्रेसपासून चोरला आहे. तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेसने मतदारांना दिलेली गॅरंटी पूर्ण करून दाखवली. आताही काँग्रेसने लाखो लोकांची मते जाणून घेत जाहीरनामा तयार केला आहे, असेही खेडा यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर