शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वारंवार वीज पुरवठा का खंडित होतो? मुख्यमंत्री, गडकरींकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:04 IST

Nagpur : दिवसाच्या कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास

नागपूर : मागील काही काळापासून शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील महावितरण, महापारेषणच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या बैठकीत इतर लोकप्रतिनिधींनीदेखील तक्रारींचा पाढा वाचला, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता तरी महावितरणचा कारभार सुरळीत होईल का हा सवाल कायम आहे.

नागपुरात झालेल्या आढावा बैठकीत नेत्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ऐन उकाड्यात रात्रीच्या वेळी वीज बंद होत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे, याकडे आमदारांनी लक्ष वेधले. यावेळी बैठकीला उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता, त्यांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने फडणवीस आणि गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील वीजपुरवठ्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन नेमक्या येत असलेल्या समस्या त्यात मांडाव्यात. समस्या तात्काळ सोडवून वीजपुरवठा देण्याचे स्पष्ट आदेश दिले.

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरी