शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 07:19 IST

आयोगाकडे जाऊन विरोधक बोलत नाहीत

नागपूर : दोन व्यक्तींकडून १६० जागांची हमी देण्यात आली होती या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार हे जबाबदार नागरिक आहेत. जर अशा प्रकारे त्यांच्याकडे कुणी आले होते तर त्यांनी पोलिस किंवा निवडणूक आयोगाकडे लगेच तक्रार का केली नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, निवडणुकीला इतके दिवस झाल्यावर असे दावे करणे यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कुणी फसवणुकीचा प्रयत्न करीत असेल तर त्यांनी पोलिसांना कळवायला हवे होते. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे चार वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना खुले आव्हान दिले आहे.

मात्र, कुणीही आयोगाला सामोरे जायला तयार नाहीत. आयोग त्यांना पत्र देत आहे, नोटीस देत आहे, अगदी जाहीर निमंत्रणदेखील देत आहे. मात्र, तिथे जाऊन विरोधक बोलत नाहीत. कारण 'शूट अँड स्कूट' म्हणजेच गोळ्या डागा आणि पळून जा ही त्यांची रणनीती यांची आहे, असा आरोप फडणवीस यांनी लावला.

ती दोन माणसं कोण, नावं जाहीर करा : आंबेडकर

राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे कोण येतो, कोण जाते याची नोंद ठेवली जाते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दोघांना घेऊन गेले, त्यांची एन्ट्री राहुल गांधींच्या घरी असणार आहे. पवारांसोबत दोन माणसे कोण होती, त्यांची नावे राहुल गांधींनी जाहीर करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वरातीमागे घोडं, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. ईव्हीएमसंदर्भात कोर्टात जाण्यासाठी आपण यापूर्वी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणीही आमच्यासोबत आले नाही. आता बोंबलत बसण्याऐवजी त्यावेळीच पाऊल उचलणे गरजेचे होते, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'इंडिया'चा मोर्चा, खरगेंकडे स्नेहभोजन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सायंकाळी 'इंडिया' आघाडीतील खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, याच दिवशी बिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणावरून आणि निवडणुकीतील फसवणुकीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाचे खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढणार आहेत. या मोर्चानंतर हे सर्व खासदार स्नेहभोजनासाठी खरगे यांच्याकडे जाणार आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवार