शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

खावटीचे २०% कमिशन कुणाच्या घशात? सोळाशे रुपयांच्या वस्तूंसाठी मोजलेत दोन हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 10:17 IST

Khawati Yojana: आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपयांच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नाहीत.

नागपूर : आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपयांच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नाहीत. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात तडजोड झाल्याचे स्पष्ट होत असून, तब्बल २० टक्के कमिशन नेमके कुणाच्या घशात गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.लॉकडाऊनमध्ये ‘खावटी’ देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबांला  २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तू स्वरूपात मिळणार होत्या. त्यासाठी ४८६ कोटींची तरतूद झाली. वस्तूच्या रूपात मिळणारा लाभ जुलैत मिळू लागला आहे. काही लाभार्थ्यांपर्यंत १२ वस्तूंच्या धान्याचे किट पोहोचले आहेत. २३१ कोटी रुपयांचे अनुदान वस्तूरूपात ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. 

असे आहे कीट१ किलो मटकी, २ किलो चवळी, ३ किलो हरभरा, १ किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ, १ किलो उडीदडाळ, ३ किलो मीठ, ५०० ग्रॅम गरम मसाला, १ लीटर शेंगदाणा तेल, ५०० ग्रॅम मिरची पावडर, ५०० ग्रॅम चहा पावडर व ३ किलो साखर. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविण्यासाठी २४ कोटींचा वाहतूक खर्च अपेक्षित आहे. बाजारातील दर लक्षात घेता १,६६८ रुपये खर्च येतो. ११ लाख ५५ हजार आदिवासींकरिता घाऊक खरेदी केली तर हे २ हजारांचे कीट १४०० रुपयांच्यावर नसेल.     - दिनेश शेराम,     अध्यक्ष, अखिल भारतीय     आदिवासी विकास परिषदबाजारातील किमतीमटकी - १ किलो - १०२ रुपयेचवळी - २ किलो - १८८ रुपयेहरभरा - ३ किलो - १९८ रुपयेपांढरा वाटाणा - १ किलो - ७८ रुपयेतूरडाळ - २ किलो - १९२ रुपयेउडीदडाळ - १ किलो - १०६ रुपयेमीठ - ३ किलो - ३० रुपयेगरम मसाला - ५०० ग्रॅम - १७० रुपयेशेंगदाणा तेल - १ लीटर - १७० रुपयेमिरची पावडर - १ किलो - १८० रुपयेचहा पावडर - ५०० ग्रॅम - १४० रुपयेसाखर - ३ किलो - ११४ रुपयेएकूण - १२ वस्तू - १६६८ रुपये

टॅग्स :nagpurनागपूर