शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेचे तिप्पट भाडे कोण भरणार?

By निशांत वानखेडे | Updated: January 14, 2025 18:05 IST

केंद्र देणार नसल्यास महाराष्ट्र सरकारने करावा खर्च : मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच ७० वर्षांनंतर भारताची राजधानी दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींना रेल्वेच्या केवळ स्लीपर श्रेणीच्या एकतर्फी भाड्यात दुतर्फा सोय करून देण्याचीही जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने घेऊ नये हे क्लेशदायक आहे. केंद्र सरकार ही जबाबदारी घेणार नसल्यास, महाराष्ट्र सरकारने प्रवास आणि निवास खर्चाची तजवीज करावी, अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.

संमेलनाच्या निवास व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदन नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या जशा सूचना दिल्या आहेत, तसेच त्यांनी संमेलन प्रतिनिधींच्या स्लीपर श्रेणीच्या, एकतर्फी तरी रेल्वे प्रवासाची सोय करून देण्याची एकतर केंद्राला विनंती करावी किंवा त्यांनी मान्य न केल्यास ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने स्वतः घ्यावी असे पत्र संस्थेचे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांना लिहिले आहे. पंजाबच्या घुमान येथे झालेल्या संमेलनावेळी तत्कालिन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सोय करून दिली होती याचे स्मरणही या पत्रात करून देण्यात आले आहे. विशेष रेल्वे जरी उपलब्ध करून देण्यात येत असली तरी त्याचे भाडे हे एरवीपेक्षा तिप्पट असते. ते कोणालाच परवडणारे नाही, त्यामुळे विशेष रेल्वे मिळूनही विशेष उपयोग काहीच नाही. संमेलनासाठी रेल्वेच्या स्लीपर श्रेणीत प्रवास करणारा मराठी भाषिक हा आर्थिक दृष्ट्या सधन, समर्थ नसतो हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे डाॅ. जाेशी म्हणाले.

विदेशी पाहुण्यांसाठी काेट्यवधीचा खर्च का?महाराष्ट्र सरकार तसेही विश्व मराठी संमेलने दरवर्षी भरवून त्यावर कोट्यवधी रुपये खर्चाची तरतूद करते. विदेशातील लोकांना या सरकारी संमेलनाला केवळ उपस्थित राहण्यासाठी काहीच गरज नसताना, प्रत्येकी सात ते आठ लाख रूपये देत वायफळ खर्चही करते. त्याची विदेशातील, तुलनेने संपन्न असलेल्या लोकांना कोणतीच गरजही नसते. ते करण्याचे थांबवून त्याऐवजी दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींच्या स्लीपर श्रेणीच्या एकतर्फी रेल्वे प्रवासाचा खर्च तरी महाराष्ट्र सरकारने करावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर