शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेचे तिप्पट भाडे कोण भरणार?

By निशांत वानखेडे | Updated: January 14, 2025 18:05 IST

केंद्र देणार नसल्यास महाराष्ट्र सरकारने करावा खर्च : मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच ७० वर्षांनंतर भारताची राजधानी दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींना रेल्वेच्या केवळ स्लीपर श्रेणीच्या एकतर्फी भाड्यात दुतर्फा सोय करून देण्याचीही जबाबदारी रेल्वे मंत्रालयाने घेऊ नये हे क्लेशदायक आहे. केंद्र सरकार ही जबाबदारी घेणार नसल्यास, महाराष्ट्र सरकारने प्रवास आणि निवास खर्चाची तजवीज करावी, अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.

संमेलनाच्या निवास व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सदन नि:शुल्क उपलब्ध करून देण्याच्या जशा सूचना दिल्या आहेत, तसेच त्यांनी संमेलन प्रतिनिधींच्या स्लीपर श्रेणीच्या, एकतर्फी तरी रेल्वे प्रवासाची सोय करून देण्याची एकतर केंद्राला विनंती करावी किंवा त्यांनी मान्य न केल्यास ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने स्वतः घ्यावी असे पत्र संस्थेचे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री व मराठी भाषा मंत्र्यांना लिहिले आहे. पंजाबच्या घुमान येथे झालेल्या संमेलनावेळी तत्कालिन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सोय करून दिली होती याचे स्मरणही या पत्रात करून देण्यात आले आहे. विशेष रेल्वे जरी उपलब्ध करून देण्यात येत असली तरी त्याचे भाडे हे एरवीपेक्षा तिप्पट असते. ते कोणालाच परवडणारे नाही, त्यामुळे विशेष रेल्वे मिळूनही विशेष उपयोग काहीच नाही. संमेलनासाठी रेल्वेच्या स्लीपर श्रेणीत प्रवास करणारा मराठी भाषिक हा आर्थिक दृष्ट्या सधन, समर्थ नसतो हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे डाॅ. जाेशी म्हणाले.

विदेशी पाहुण्यांसाठी काेट्यवधीचा खर्च का?महाराष्ट्र सरकार तसेही विश्व मराठी संमेलने दरवर्षी भरवून त्यावर कोट्यवधी रुपये खर्चाची तरतूद करते. विदेशातील लोकांना या सरकारी संमेलनाला केवळ उपस्थित राहण्यासाठी काहीच गरज नसताना, प्रत्येकी सात ते आठ लाख रूपये देत वायफळ खर्चही करते. त्याची विदेशातील, तुलनेने संपन्न असलेल्या लोकांना कोणतीच गरजही नसते. ते करण्याचे थांबवून त्याऐवजी दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींच्या स्लीपर श्रेणीच्या एकतर्फी रेल्वे प्रवासाचा खर्च तरी महाराष्ट्र सरकारने करावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर