शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

कोण होणार अध्यक्ष... नारळीकर, सासणे की वाघमारे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST

- ९४ वे साहित्य संमेलन : नारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार! - वि.सा. संघाकडून सासणेंचे नाव, राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या ...

- ९४ वे साहित्य संमेलन : नारळीकरांच्या अटी महामंडळ मान्य करणार!

- वि.सा. संघाकडून सासणेंचे नाव, राष्ट्रवादीचा किल्ला वाघमारेंच्या मागे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट व्हायला लागले आहे. अध्यक्षपदाचे नाव जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राजकारण, साहित्यकारण आणि अट-कारणाचा खेळ रंगला आहे. जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव निश्चित होणार असून, नारळीकरांचे पारडे अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या इच्छेवरून जड ठरत आहे.

संमेलन स्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते. घुमान साहित्य संमेलनातील मानापमान नाट्यामुळे, महामंडळ अध्यक्षांची पसंती त्यांच्याच नावाला असल्याचेही बोलले जाते. विदर्भ साहित्य संघासाठीही आपुलकीचा विषय असल्याच्या कारणाने घटकसंस्था म्हणून भारत सासणे यांचे एकट्याचेच नाव अध्यक्षपदासाठी म्हणून सुचविण्यात आले आहे. तसे पाहता प्रत्येक घटक संस्थेला तीन नावांचे पर्याय देण्याचा अधिकार आहे. मात्र, वि.सा. संघाने दुसऱ्या कुणाचेही पर्याय देण्यापेक्षा सासणे यांच्याच नावाचा विचार केला आहे. त्यातच नाशिक साहित्य संमेलन हे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडात होत आहे आणि छगन भुजबळ हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. त्याच अनुषंगाने माजी महापौर, माजी खासदार प्रसिद्ध साहित्यिक जनार्दन वाघमारे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांच्या नावाला भुजबळ यांचा पाठिंबा असल्याने सासणे की वाघमारे, अशा विवंचनेत महांडळ होते. त्यावर तोडगा म्हणून महामंडळाकडून प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचे संशोधक व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना आधीपासूनच विचारणा केली जात होती. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे नारळीकरांनी प्रारंभी स्पष्ट नकार कळवला होता. मात्र, आता त्यांनी काही अटींसकट आपल्या नावाच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. केवळ उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, उर्वरित तीनही दिवस ते नसतील, ऑनलाईन भाषण व मुलाखत देतील, अशा त्या अटी आहेत. नारळीकर हे अध्यक्ष झाल्यास प्रथमच विज्ञान क्षेत्रातील साहित्यिकाला हा बहुमान मिळणार आहे. विशेष म्हणजे, नारळीकरांच्या नावाला कुणाचा विरोधही नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे पारडे जड ठरत आहे.

गेल्या संमेलनात परंपरा खंडित

गेल्या संमेलनात संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ऐनवेळी प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांनी व्हीलचेअरवर उपस्थित राहून संमेलनाचे उद्घाटन केले होते आणि नंतर उपचारासाठी मुंबईला गेले होते. इतिहासात प्रथमच संमेलनाध्यक्षांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला होता. यंदा नारळीकरांनी सादर केलेली अट महामंडळाने मान्य केल्यास, इतिहासाची पुनरावृत्ती लागोपाठ होणार आहे. अशा स्थितीत संमेलनाध्यक्ष पदाबाबत अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

..........