शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे

By नरेश डोंगरे | Updated: November 23, 2023 22:06 IST

हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला.

नागपूर : रेल्वेत प्रवास करताना बाजूला बसलेल्या अनोळखी व्यक्तीने काही खायला किंवा प्यायला दिले, कितीही चांगलेपणा दाखविला आणि कितीही आग्रह धरला तर त्याला नम्रपणे नकार द्या. अन्यथा तुमच्यासोबत मोठा धोका होऊ शकतो. हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला.

जागरूकता करायची असेल तर त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करायला हवी. कारण शालेय जीवनात गिरवलेले धडे विद्यार्थ्यांच्या लक्षात आयुष्यभर राहतात. हे ध्यानात ठेवून आरपीएफकडून आज अजनीच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास अन् रेल्वेशी संबंधित सुरक्षेच्या उपाययोजनांचे धडे देण्यात आले. तुम्ही एकटे, मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत रेल्वेने प्रवास करीत असाल, तुमच्या बाजूला कुणी दुसरे प्रवासी बसले असेल. त्यातील कुणी महिला, पुरुष अथवा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला मोठ्या प्रेमाने काही खायला प्यायला देत असेल, आग्रह धरत असेल तरी ते घेऊ नका. त्यांना नम्रपणे नकार द्या. अन्यथा त्या चिजवस्तू तुम्ही खाल्या किंवा पिले तर तुम्ही काही वेळेनंतर बेशुद्ध पडाल. त्यानंतर पुढे कित्येक तास तुम्ही अचेत असाल. तुमच्या जिवालाही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या वेळेत ते आरोपी तुमच्या माैल्यवान चिजवस्तू, रोकड आणि दागिने पळवून नेतील. रेल्वे पोलिसांच्या भाषेत या प्रकाराला 'जहर खुराणी' म्हणतात. अशा घटना ठिकठिकाणी वारंवार घडतात. त्या तुमच्या सोबत होऊ नये, याची तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

दुसरे म्हणजे, तुम्ही ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन प्रवास करू नका, कुणी करत असेल तर लगेच रेल्वे स्थानक अथवा रेल्वेगाडीतील जवानांना त्याची माहिती द्या. रेल्वेगाडी येताना दिसत असेल तर तुम्ही रेल्वे रूळ (लाइन) ओलांडू नका. आवश्यक नसताना विनाकारण रेल्वेत चेन पुलिंग (साखळी ओढणे) करू नका, या आणि अशाच प्रकारच्या अनेक सुरक्षेच्या टीप्स आरपीएफने विद्यार्थ्यांना दिल्या. त्या संबंधाचे धोके सांगून काही प्रात्यक्षिकेही दाखवली.

रेल्वे गेटजवळ बसू नकागाडीत जागा नसल्यामुळे अनेकजण रेल्वेच्या डब्याच्या दारावर (पायदानावर) बसतात. हे अत्यंत धोकादायक आहे. त्याचप्रमाणे स्टेशन आल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होतो तेव्हा अनेकजण गाडी थांबली नसूनही फलाटावर उतरण्याचा प्रयत्न करतात. हेसुद्धा जीव धोक्यात घालणारे आहे. त्यामुळे ते करू नका आणि रेल्वेशी संबंधित सर्व सुरक्षेच्या उपाययोजनांची आणि खबरदारीची माहिती आपल्या नातेवाईक तसेच मित्र परिवाराला देण्याचे आवाहनही यावेळी आरपीएफने विद्यार्थ्यांना केले.

टॅग्स :railwayरेल्वेStudentविद्यार्थी