शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे

By नरेश डोंगरे | Updated: November 23, 2023 22:06 IST

हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला.

नागपूर : रेल्वेत प्रवास करताना बाजूला बसलेल्या अनोळखी व्यक्तीने काही खायला किंवा प्यायला दिले, कितीही चांगलेपणा दाखविला आणि कितीही आग्रह धरला तर त्याला नम्रपणे नकार द्या. अन्यथा तुमच्यासोबत मोठा धोका होऊ शकतो. हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला.

जागरूकता करायची असेल तर त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करायला हवी. कारण शालेय जीवनात गिरवलेले धडे विद्यार्थ्यांच्या लक्षात आयुष्यभर राहतात. हे ध्यानात ठेवून आरपीएफकडून आज अजनीच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवास अन् रेल्वेशी संबंधित सुरक्षेच्या उपाययोजनांचे धडे देण्यात आले. तुम्ही एकटे, मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत रेल्वेने प्रवास करीत असाल, तुमच्या बाजूला कुणी दुसरे प्रवासी बसले असेल. त्यातील कुणी महिला, पुरुष अथवा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला मोठ्या प्रेमाने काही खायला प्यायला देत असेल, आग्रह धरत असेल तरी ते घेऊ नका. त्यांना नम्रपणे नकार द्या. अन्यथा त्या चिजवस्तू तुम्ही खाल्या किंवा पिले तर तुम्ही काही वेळेनंतर बेशुद्ध पडाल. त्यानंतर पुढे कित्येक तास तुम्ही अचेत असाल. तुमच्या जिवालाही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या वेळेत ते आरोपी तुमच्या माैल्यवान चिजवस्तू, रोकड आणि दागिने पळवून नेतील. रेल्वे पोलिसांच्या भाषेत या प्रकाराला 'जहर खुराणी' म्हणतात. अशा घटना ठिकठिकाणी वारंवार घडतात. त्या तुमच्या सोबत होऊ नये, याची तुम्ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

दुसरे म्हणजे, तुम्ही ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन प्रवास करू नका, कुणी करत असेल तर लगेच रेल्वे स्थानक अथवा रेल्वेगाडीतील जवानांना त्याची माहिती द्या. रेल्वेगाडी येताना दिसत असेल तर तुम्ही रेल्वे रूळ (लाइन) ओलांडू नका. आवश्यक नसताना विनाकारण रेल्वेत चेन पुलिंग (साखळी ओढणे) करू नका, या आणि अशाच प्रकारच्या अनेक सुरक्षेच्या टीप्स आरपीएफने विद्यार्थ्यांना दिल्या. त्या संबंधाचे धोके सांगून काही प्रात्यक्षिकेही दाखवली.

रेल्वे गेटजवळ बसू नकागाडीत जागा नसल्यामुळे अनेकजण रेल्वेच्या डब्याच्या दारावर (पायदानावर) बसतात. हे अत्यंत धोकादायक आहे. त्याचप्रमाणे स्टेशन आल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होतो तेव्हा अनेकजण गाडी थांबली नसूनही फलाटावर उतरण्याचा प्रयत्न करतात. हेसुद्धा जीव धोक्यात घालणारे आहे. त्यामुळे ते करू नका आणि रेल्वेशी संबंधित सर्व सुरक्षेच्या उपाययोजनांची आणि खबरदारीची माहिती आपल्या नातेवाईक तसेच मित्र परिवाराला देण्याचे आवाहनही यावेळी आरपीएफने विद्यार्थ्यांना केले.

टॅग्स :railwayरेल्वेStudentविद्यार्थी