शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पोषण आहारावर लाखो रुपये खर्च होत असताना विद्यार्थ्यांचे वजन वाढेना

By सुमेध वाघमार | Updated: March 9, 2023 17:25 IST

२७ टक्के विद्यार्थ्यांचे वजन कमी : मेयोने केलेल्या विद्यार्थ्यांचा तपासणीतील वास्तव

नागपूर : विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे, यासाठी माध्यान्ह भोजन खिचडीवर सरकार लाखो रुपये खर्च करीत आहे. असे असताना, विद्यार्थ्यांचे वजन वाढत नसल्याचे वास्तव स्थूलपणा जनजागृती व प्रतिबंध शिबिरातून पुढे आले. मेयोने केलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीत २७ टक्के विद्यार्थी कमी वजनाचे आढळून आले.

वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग व मेयोच्यावतीने स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने मेयोतील डॉक्टरांच्या एका पथकाने चिंचभुवन भारतीय विद्या भवन, शंकरनगर येथील मूकबधीर विद्यालय, गांधीनगर येथील महाराष्ट्र अध्ययन मंदिर हायस्कूल, गांधीबाग येथील पन्नालाल देवडिया हिंदी मीडियम स्कूल व राहतेकरवाडी महाल येथील साने गुरुज़ी उर्दू मीडियम स्कूलमधील २८४ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख व प्राध्यापक डॉ. दीप्ती चांद, नोडल अधिकारी डॉ. पांढरीपांडे, डॉ. प्रशांत बागडे व डॉ. राखी जोशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

- ७६ विद्यार्थी कमी वजनाचे

अभियानात सातवी ते नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उंची आणि वजनाच्या आधारावरील ‘बीएमआय इंडेक्स’नुसार २६.७६ टक्के विद्यार्थी म्हणजे, ७६ विद्यार्थी कमी वजनाचे आढळून आले.

सात विद्यार्थी लठ्ठ, तर ३० विद्यार्थ्यांचे वजन अधिक

तपासणीमध्ये २.४६ टक्के म्हणजे, सात विद्यार्थी लठ्ठ असल्याचे, तर १०.५६ टक्के म्हणजे, ३० विद्यार्थ्यांचे वजन ‘बीएमआय इंडेक्स’पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांना वजन नियंत्रणात ठेवण्याविषयी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

 ‘बॅलेन्स’ आहाराचा अभाव

एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे, तर दुसरीकडे कमी वजन असलेले विद्यार्थीही आढळून येत आहेत. यावरून आपला आहार ‘बॅलेन्स’ नसल्याचे दिसून येते. यामुळे प्रत्येक पालकाने आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांचे योग्य पोषण व्हायला हवे. सोबतच मैदानी खेळ खेळणेही आवश्यक आहे.

- डॉ. दीप्ती चांद, प्रमुख औषध वैद्यकशास्त्र विभाग, मेयो

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूरStudentविद्यार्थीfoodअन्न