शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कुठे जीवदान, कुठे पिकांची माती; १० हजार घरांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 07:45 IST

या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

राज्याचा काही भाग अजूनही पावसासाठी आसुसलेला असताना शनिवारी जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान केले आहे.  नांदुरा (जि. बुलढाणा) येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.  दरम्यान, नागपुरातील पूर ओसरला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

नागपुरात पुराने ५ जणांचा मृत्यू, १० हजार घरांचे नुकसान

नागपूर  : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे नागपुरातील सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जनावरेही दगावली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.   शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीत नागपूरकरांना मोठा फटका बसला. अंबाझरी तलाव पाण्याचा ओव्हर फ्लो होऊन हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या सर्व घटनाक्रमात पाच जणांचा मृत्यू झाला. यात मीराबाई पिल्ले (७०), संध्या ढोरे (८०), संजय गाडेगावकर (५२), कृष्णकुमार लेखराम बरखंडी (२१) आणि एक अनोळखी या मृतांचा समावेश आहे.

रविवारी दुपारपासून नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. महानगरपालिकेचे ६० कर संग्राहक, १५ महसूल निरीक्षक, १० सहायक अधीक्षक यांची

टीम जिल्हा प्रशासनाच्या दिमतीला आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी  

n उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश जारी केले. त्यानंतर फडणवीस यांनी रविवारी सकाळी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. n काही वस्त्यांना भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.

टॅग्स :CropपीकCrop Insuranceपीक विमाRainपाऊस