शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

अवाजवी वीज बिलांसाठी पैसा आणायचा कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव, नापिकी आणि काेराेना संक्रमण यामुळे शेतकरी आधीच ...

चक्रधर गभणे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : शेतमालाला बाजारात मिळणारा कमी भाव, नापिकी आणि काेराेना संक्रमण यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषिपंपांचे अवाजवी विजेचे बिल पाठविले आहे. बिल भरण्यासाठी त्या बिलांमध्ये नमूद असलेली एक ते दाेन लाख रुपयाची रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे, बिल न भरल्याने महावितरण कंपनीने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ओलिताची समस्या ऐरणीवर आली आहे.

माैदा तालुक्यातील रेवराल, खंडाळा परिसरात सध्या मिरची, गहू, हरभरा व काही भाजीपाल्याची पिके आहेत. या पिकांना सतत पाण्याची अर्थात ओलिताची आवश्यकता आहे. त्यातच महावितरण कंपनीने कृषिपंपधारक शेतकऱ्यांना विजेची बिले पाठविली असून, बहुतांश बिलांमध्ये थकीत रक्कम ही एक लाख रुपयापेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. काहींना एक लाख रुपये, काहींना दीड लाख रुपये तर काहींना १ लाख ८० हजार रुपयांची बिले प्राप्त झाली आहेत.

यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ही थकीत बिले असल्याची माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे, महावितरण कंपनीने आपल्याला सन २०११ पासून आजवर एकही बिल पाठविले नाही. तेव्हापासून आजवरच्या बिलांची एकमुस्त वसुली महावितरण कंपनी करीत असल्याचा आराेप मांगली (ता. माैदा) येथील सुधीर मुमनेनी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरण कंपनीने मागील सात वर्षे बिले का पाठविली नाहीत. त्यांना आताच जाग आली का, असा प्रश्न करीत हा शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आराेपही काहींनी केला.

यावर्षी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानाच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात माेठी घट आली आहे. त्यामुळे त्यांनी रबी व भाजीपाल्याच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले. आता वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने रबी पिकेही हातची जाण्याची शक्यता बळावली आहे.

....

पिके धाेक्यात

रेवराल, खंडाळा मांगली येथील ९० टक्के शेतकऱ्यांकडील कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पिकांचे ओलित करणे शक्य हाेत नाही. शिवाय, या भागात कृषिपंपाशिवाय ओलिताचे दुसरे साधनही शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिके धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. शासनाच्या या प्रकारामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद हाेणार असून, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

...

महावितरण कंपनी वीजचाेरी करणाऱ्यांवर काेणतीही कारवाई करीत नाही. त्यांनी आमच्याकडे बिलाची रक्कम असल्याचे सांगून ती न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजचाेरीचा भुर्दंडही आमच्याकडूनच वसूल केला जाताे. कंपनीने आम्ही वापरलेल्या वीज युनिटचे नियमित बिल द्यावे. सरासरी व अवाजवी बिलाची आकारणी करू नये.

- सुधीर मुमनेनी,

शेतकरी, रा. मांगली, ता. माैदा.

...

कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ही कारवाई राज्य शासनाच्या आदेशान्वये केली जात आहे. शेतकऱ्याने त्यांच्याकडे थकीत असलेल्या बिलाची ५० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. माैदा तालुक्यात टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा खंडित करणे आणि बिलाचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करणे सुरू आहे.

- रूपेश टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता,

महावितरण कंपनी, माैदा.