झामरे गेला तरी कुठे ?

By Admin | Updated: May 14, 2014 14:18 IST2014-05-14T00:40:17+5:302014-05-14T14:18:26+5:30

गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणारा महाठग जयंत प्रभाकर झामरे हा बिनधास्त शहरात वावरत असताना तो समन्स आणि वॉरंट बजावणाऱ्या पोलिसांना मात्र गवसत नसल्याची माहिती आहे.

Where did you go? | झामरे गेला तरी कुठे ?

झामरे गेला तरी कुठे ?

७0 प्रकरणातील समन्स व वॉरंट परत: पोलिसांना का दिसत नाही ?

 

 

गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणारा महाठग जयंत प्रभाकर झामरे हा बिनधास्त शहरात वावरत असताना तो समन्स आणि वॉरंट बजावणाऱ्या पोलिसांना मात्र गवसत नसल्याची माहिती आहे. ही धक्कादायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

चेक बाऊन्स प्रकरणी अनेकांनी झामरेविरुद्ध ‘निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अँक्टच्या १३८ कलमांतर्गत खटले भरले आहेत. जवळपास ७0 प्रकरणात विशेष न्यायालयाने झामरेविरुद्ध समन्स आणि वॉरंट जारी केले आहेत. पोलीस समन्स व वॉरंट घेऊन झामरेच्या घरी जातात परंतु तो गवसला नसल्याचे कारण नमूद करून परत येतात. अर्थात या दोन्ही आदेशांची अंमलबजावणीच होत नाही. ‘क्रेडिट’ आर्थिक गुन्हे पथकाने घेतली होती. या घोटाळ्याचा तपासही योग्यरीत्या झाला नसल्याचेही बोलले जात आहे.

 

शहरात बिनधास्त वावरणारा झामरे पोलिसांना कसा काय गवसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. झामरे हा समन्स किंवा वॉरंट घेऊन येणार्‍या पोलिसांचे हात ओले करून पाठवित असल्याचे या सूत्राचे म्हणणे आहे. सध्या जयंत आणि त्याची पत्नी वर्षा झामरे जामिनावर बाहेर आहेत. त्याच्यांविरुद्ध २२ मे २0१२ रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४0९, ४२0, १0९, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदाराचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. २९५ गुंतवणूकदारांच्या दाखल तक्रारीनुसार या दाम्पत्याने १४ कोटी रुपयांनी ही फसवणूक केलेली आहे.

 

या दाम्पत्याने २0१0 मध्ये जे.एस. कॅपिटल सर्व्हिसेस आणि जे. एस. फायनान्शियल सर्व्हिसेस, या नावाने गुंतवणूक कार्यालये उघडून दर महिन्याला पाच ते सहा टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. प्रत्यक्षात फसल्या गेलेले गुंतवणूकदार ४00 च्या घरात असून त्यांची रक्कम २0 कोटींच्या वर आहे. गुंतवणुकीत अनेकांचा काळा पैसा असल्याने आयकर चौकशीच्या जाचामुळे त्यांनी पोलिसात तक्रारच नोंदवलेली नाही. काही महिने नियमित व्याज देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादित केला. त्यानंतर अचानक आपल्या कार्यालयांना कुलूप ठोकून हे दाम्पत्य फरार झाले होते. वर्षा झामरे हिला नाशिक येथे ३१ मे २0१२ रोजी अटक करण्यात आली होती. जयंत हा प्रत्यक्षात वाडी भागात ३0 जुलै २0१२ रोजी पोलिसांना शरण आला होता. परंतु सापळा रचून त्याला अटक केल्याचे

 

 

Web Title: Where did you go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.