शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा कोरा करू म्हणणारे सत्ता येताच कुठे लपले? परिणय फुके यांचा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:01 IST

सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला.

ठळक मुद्दे२५ हजार हेक्टरी मदत कधी मिळणार : सातबारा कोरा करण्यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. सातबारा कोरा करू, हेक्टरी २५ हजारांची मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई व मदत मिळालेली नाही. सातबारा कोरा करायचा तर यासाठी ५० हजार कोटी कसे आणणार, सत्ता स्थापन होताच आश्वासन देणारे कुठे लपून बसले असा सवाल भाजपचे परिणय फुके यांनी गुरुवारी विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केला.महाविकास आघाडी सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडणारे आहे का अशी शंका येते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी ५० हजार कोटींची तरतूद कशी करणार याचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात नाही.हैदराबाद येथील महिला आत्याचाराच्या प्रकरणानंतर आंध्रप्रदेश सरकारने गुन्हेगारांना २१ दिवसात फाशी देण्याचा कायदा केला आहे. गुन्हेगारांत धाक निर्माण करण्याठी असा निर्णय राज्य शासनाने घेतल्यास किंवा तशी भूमिका घेतल्यास महिलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, अशी भूमिका फुके यांनी मांडली. महाविकास आघाडी सरकारने गेल्या २० दिवसात फक्त स्थगिती देण्याचे काम केले. विकास कामे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच मंजूर केली जातात. असे असताना कुठलेही ठोस कारण न देता विकास कामांना स्थगिती दिली जात आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे नक्षलप्रभावित आहेत. ह्या भागातील आदिवासीचा सर्वांगीण विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या सुरक्षेची हमी इत्यादी बाबींचा या अभिभाषणात काहीच उल्लेख नसणे हे खेदजनक आहे. आदिवासीसाठी शासनाने कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे.विदर्भातील जनतेला मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी सुलभतेने मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे स्वतंत्र कक्ष सुरू केला होता. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुध्दा या कक्षातून अनेक गरजूना लाभ झाला होता. नवीन सरकारने हा कक्ष बंद केला असून तो सुरू करावा म्हणजे विदर्भातील जनतेला न्याय मिळेल,असे फुके यांनी म्हटले.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेVidhan Parishadविधान परिषदFarmerशेतकरी