शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आपण कधी गंभीर होणार?; कोरोनाच्या दहशतीत सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:27 IST

एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोमवारपासून नागपूर शहरात साथरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनांना परवानगी नाकारली आहे. तरीही असे कार्यक्रम आयोजित केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. सरकार वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. सतर्क राहा, सावधगिरी बाळगा अशा सूचना दिल्या जात आहेत. एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी प्रशासनाने काही काळ अनावश्यक गोष्टींना टाळा, असे आवाहन केले आहे. पण सकाळी सकाळी पोह्यांच्या ठेल्यावरचे चित्र बघून आपण कधी गंभीर होणार? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सकाळी रस्त्याच्या कडेला पोहे विक्रेत्यांकडे तरुण, तरुणींपासून मोठ्यांचीही गर्दी दिसून आली. काही ज्येष्ठही उघड्यावर मनसोक्त गप्पाटप्पा करीत पोह्यावर ताव मारत होते. पोहे विक्रेता उघड्यावर पोहे बनवीत होता. पोहे खाल्ल्यानंतरच्या प्लेट पाण्याने केवळ विसळून पुन्हा त्यात पोहे देत होता. आरोग्य विभागाने दोन मीटरचे अंतर पाळा, असे आवाहन केले आहे. मात्र काही तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक गर्दी केल्यासारखे मस्त पोहे खात होते. शहरातील आशीर्वादनगर, म्हाळगीनगर, सक्करदरा, मानेवाडा चौक, मेडिकल चौक, अयोध्यानगर या रस्त्यावरील चाट सेंटर, इडली-डोसा विक्रेते, चहा विक्रेते यांच्या टपरीवरही असेच चित्र दिसून आले. ना नागरिकांना आरोग्याची भीती होती, ना विक्रेत्यांना. रस्त्यावरील अस्वच्छ वातावरण, उघड्यावरील अन्नपदार्थ हेसुद्धा कोरोनासाठी घातक ठरू शकते, याचेही भान नागरिकांना नसल्याचे दिसून आले.सायंकाळच्या सुमारासही बजाजनगर, आयटी पार्क, अंबाझरी, शंकरनगर, या भागातही लागणारे चायनीजचे ठेले, आयस्क्रीम विक्रेते यांच्याही दुकानांवर तरुणाईची गर्दी दिसून आली. येथेही विक्रेते कुठल्याही खबरदारीशिवाय आपला व्यवसाय करीत होते. तरुण मंडळीही ग्रुपने खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत होती.सतर्कता काहीच दिवसांसाठीकोरोनाचा प्रभाव सध्या शहरात जाणवतो आहे. त्यामुळे प्रत्येकाची सुरक्षा प्रत्येकाच्या हातात आहे. काही दिवसच काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या सवयी, आवडीनिवडी बाजूला ठेवून, कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, याचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस