शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपण कधी गंभीर होणार?; कोरोनाच्या दहशतीत सतर्कता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:27 IST

एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोमवारपासून नागपूर शहरात साथरोग कायदा लागू करून कलम १४४ ची नोटीस बजावली आहे. विविध कार्यक्रम, रॅली, प्रदर्शनांना परवानगी नाकारली आहे. तरीही असे कार्यक्रम आयोजित केल्यास कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. सरकार वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. सतर्क राहा, सावधगिरी बाळगा अशा सूचना दिल्या जात आहेत. एकीकडे कोरोनामुळे अख्खे प्रशासन वेठीस धरले असताना, नागपूरकर सर्रास त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी प्रशासनाने काही काळ अनावश्यक गोष्टींना टाळा, असे आवाहन केले आहे. पण सकाळी सकाळी पोह्यांच्या ठेल्यावरचे चित्र बघून आपण कधी गंभीर होणार? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सकाळी रस्त्याच्या कडेला पोहे विक्रेत्यांकडे तरुण, तरुणींपासून मोठ्यांचीही गर्दी दिसून आली. काही ज्येष्ठही उघड्यावर मनसोक्त गप्पाटप्पा करीत पोह्यावर ताव मारत होते. पोहे विक्रेता उघड्यावर पोहे बनवीत होता. पोहे खाल्ल्यानंतरच्या प्लेट पाण्याने केवळ विसळून पुन्हा त्यात पोहे देत होता. आरोग्य विभागाने दोन मीटरचे अंतर पाळा, असे आवाहन केले आहे. मात्र काही तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक गर्दी केल्यासारखे मस्त पोहे खात होते. शहरातील आशीर्वादनगर, म्हाळगीनगर, सक्करदरा, मानेवाडा चौक, मेडिकल चौक, अयोध्यानगर या रस्त्यावरील चाट सेंटर, इडली-डोसा विक्रेते, चहा विक्रेते यांच्या टपरीवरही असेच चित्र दिसून आले. ना नागरिकांना आरोग्याची भीती होती, ना विक्रेत्यांना. रस्त्यावरील अस्वच्छ वातावरण, उघड्यावरील अन्नपदार्थ हेसुद्धा कोरोनासाठी घातक ठरू शकते, याचेही भान नागरिकांना नसल्याचे दिसून आले.सायंकाळच्या सुमारासही बजाजनगर, आयटी पार्क, अंबाझरी, शंकरनगर, या भागातही लागणारे चायनीजचे ठेले, आयस्क्रीम विक्रेते यांच्याही दुकानांवर तरुणाईची गर्दी दिसून आली. येथेही विक्रेते कुठल्याही खबरदारीशिवाय आपला व्यवसाय करीत होते. तरुण मंडळीही ग्रुपने खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत होती.सतर्कता काहीच दिवसांसाठीकोरोनाचा प्रभाव सध्या शहरात जाणवतो आहे. त्यामुळे प्रत्येकाची सुरक्षा प्रत्येकाच्या हातात आहे. काही दिवसच काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या सवयी, आवडीनिवडी बाजूला ठेवून, कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही, याचे भान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस