शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 23:44 IST

शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली होती. परंतु वर्षे लोटल्यानंतरही अभ्यासगटाकडून कुठल्याही शिफारशी शासनाला प्राप्त झाल्या नाहीत.

ठळक मुद्दे अभ्यास समिती वर्षभरापासून निष्क्रि य : शासन म्हणते, समितीचा अहवालच नाही तर आदेश कसे काढणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली होती. परंतु वर्षे लोटल्यानंतरही अभ्यासगटाकडून कुठल्याही शिफारशी शासनाला प्राप्त झाल्या नाहीत. राज्य सरकार पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दोन कालबद्ध पदोन्नती देत होते. त्यात सुधार करून १०, २० आणि ३० अशी विभागणी करून तीन लाभांची नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केली. या योजनेचा लाभ खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला.खासगी आस्थापनेतील शिक्षकांनाही लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासगटाची निर्मिती केली होती. ३१ जुलै २०१९ रोजी यासंदर्भात शासननिर्देश काढण्यात आला होता. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीत शिक्षण संचालक, विद्या प्राधिकरणाचे संचालक आदी सदस्य होते. अभ्यासगटाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यांनी शिक्षक व क्रीडा विभागाला माहितीच्या अधिकारात शिक्षकांना सुधारितआश्वासित प्रगती योजना कधी लागू होईल, याची माहिती मागितली. त्या अनुषंगे त्यांना कळविण्यात आले की, शिफारशींकरिता लागू करण्यात आलेल्या अभ्यास गटाचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोणतेही आदेश निर्गमित केले नाहीत.शिक्षकांना मुद्दाम वंचित ठेवण्यात येतेयएका वर्षाचा काळ लोटल्यानंतरही अभ्यासगटाने काहीही केलेले नाही. शासन अभ्यासगट निर्माण करण्याचा केवळ देखावा करीत आहे. अभ्यासगटाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. वर्षभरात समितीचा अहवालच आला नाही, विभाग त्या संदर्भात गंभीर नाही, याचाच अर्थ शिक्षकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. अभ्यासगटातील मंडळी अभ्यासच करीत नसेल तर अभ्यासगट स्थापन करून काय फायदा, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर