शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 23:44 IST

शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली होती. परंतु वर्षे लोटल्यानंतरही अभ्यासगटाकडून कुठल्याही शिफारशी शासनाला प्राप्त झाल्या नाहीत.

ठळक मुद्दे अभ्यास समिती वर्षभरापासून निष्क्रि य : शासन म्हणते, समितीचा अहवालच नाही तर आदेश कसे काढणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली होती. परंतु वर्षे लोटल्यानंतरही अभ्यासगटाकडून कुठल्याही शिफारशी शासनाला प्राप्त झाल्या नाहीत. राज्य सरकार पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दोन कालबद्ध पदोन्नती देत होते. त्यात सुधार करून १०, २० आणि ३० अशी विभागणी करून तीन लाभांची नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केली. या योजनेचा लाभ खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला.खासगी आस्थापनेतील शिक्षकांनाही लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासगटाची निर्मिती केली होती. ३१ जुलै २०१९ रोजी यासंदर्भात शासननिर्देश काढण्यात आला होता. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीत शिक्षण संचालक, विद्या प्राधिकरणाचे संचालक आदी सदस्य होते. अभ्यासगटाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यांनी शिक्षक व क्रीडा विभागाला माहितीच्या अधिकारात शिक्षकांना सुधारितआश्वासित प्रगती योजना कधी लागू होईल, याची माहिती मागितली. त्या अनुषंगे त्यांना कळविण्यात आले की, शिफारशींकरिता लागू करण्यात आलेल्या अभ्यास गटाचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोणतेही आदेश निर्गमित केले नाहीत.शिक्षकांना मुद्दाम वंचित ठेवण्यात येतेयएका वर्षाचा काळ लोटल्यानंतरही अभ्यासगटाने काहीही केलेले नाही. शासन अभ्यासगट निर्माण करण्याचा केवळ देखावा करीत आहे. अभ्यासगटाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. वर्षभरात समितीचा अहवालच आला नाही, विभाग त्या संदर्भात गंभीर नाही, याचाच अर्थ शिक्षकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. अभ्यासगटातील मंडळी अभ्यासच करीत नसेल तर अभ्यासगट स्थापन करून काय फायदा, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर