नगरपालिकेला स्थायी मुख्याधिकारी मिळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:52+5:302021-03-07T04:08:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली आणि या पदाचा प्रभार ...

नगरपालिकेला स्थायी मुख्याधिकारी मिळणार कधी?
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली आणि या पदाचा प्रभार पारशिवनीनगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडे साेपविण्यात आला. शासनाने या पालिकेवर स्थायी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने शहरातील विविध विकासकामांसाेबतच नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली आहेत. त्यामुळे शहरातील काेरोना संक्रमण उपाययाेजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रामटेकला पाैराणिक पार्श्वभूमी लाभल्याने ते महत्त्वाचे पर्यटनस्थळ बनले आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्य शासनाने विकास आराखडा तयार करून त्याअंतर्गत काही कामेही सुरू केली आहेत. मार्च २०२० पासून जिल्ह्यात काेराेना संक्रमणाला सुरुवात झाली आणि रामटेक शहरातही काेराेना रुग्ण आढळून आले. त्यातच शासनाने पालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यांच्या जागी तातडीने स्थायी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न करता अर्चना वंजारींकडे प्रभार साेपविला.
शहराचा विकास, जनता आणि शासन यात मुख्याधिकारी महत्त्वाचा दुवा ठरतात. अर्चना वंजारी या आठवड्यातील काही दिवस रामटेक शहरात येत असल्याने तसेच त्यांना पारशिवनी नगर पंचायतचीही कामे बघावी लागत असल्याने रामटेक पालिकेचे कामकाम व शहरातील विकासकामे यावर नियंत्रण ठेवणे व ते मार्गी लावणे यात त्यांचीही फरफट हाेत आहे. शहरात काेराेना संक्रमण असून, बहुतांश नागरिक मास्क न वापरता फिरतात. बाजारात व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही.
...
विविध कामे प्रभावित
पालिकेला स्थायी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण हटाव माेहीम, प्लास्टिक बंदी माेहीम, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची अंमलबजावणी तसेच या बाबींचे उल्लंघन केल्यानंतर करावयाची दंडात्मक कारवाई थंडबस्त्यात गेली आहे. शहरात पार्किंगची माेठी समस्या असून, वाहतूक काेंडीमुळे भांडणे हाेतात. ती समस्याही जैसे थेच आहे. हा प्रकार महात्मा गांधी चाैक व बसस्थानक चाैकात सर्वाधिक घडताे. साेबतच शहरातील जलतरण प्रकल्प, राखी तलाव साैंदर्यीकरण, नळयाेजना, रस्ते दुरुस्ती, घरकुल याेजना, उद्यान दुरुस्ती, पार्किंग, तीर्थक्षेत्र विकास, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियान, शिक्षण, आराेग्य, कर संकलन यासह अन्य बाबी प्रभावित झाल्या आहेत.