शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुंबईच्या धर्तीवर नागपूर ट्राफिक पोलीसांची भाषा कधी बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 23:24 IST

Traffic Police Language, Nagpur News ट्रॅफिक पोलिसाच्या तोंडून तुम्हास सर, मॅडम किंवा श्रीमान, श्रीमती अशी हाक तुमच्या संदर्भात येत असेल तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण, सर्वसामान्यांशी ट्रॅफिक पोलिसांनी सभ्यतेने बोलण्याचा पुढाकार मुंबईमध्ये सुरू झाला आहे. वाहन चालक, नागरिकांशी सभ्य वागण्याचे निर्देश तेथील ट्रॅफिकचे सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देमुंबईत वाहन चालकांशी सभ्यतेने वागण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ट्रॅफिक पोलिसाच्या तोंडून तुम्हास सर, मॅडम किंवा श्रीमान, श्रीमती अशी हाक तुमच्या संदर्भात येत असेल तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण, सर्वसामान्यांशी ट्रॅफिक पोलिसांनी सभ्यतेने बोलण्याचा पुढाकार मुंबईमध्ये सुरू झाला आहे. वाहन चालक, नागरिकांशी सभ्य वागण्याचे निर्देश तेथील ट्रॅफिकचे सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले आहेत. सोबतच रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या वाहन चालकांशी सौम्यतेने संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे. नागपुरात मात्र असल्या तऱ्हेचे कुठलेच निर्देश अद्याप तरी नाहीत. परंतु, मुंबईत होत असलेल्या या प्रयोगाची अंमलबजावणी नागपुरातही होण्याची प्रतीक्षा नागपूरकर करत आहेत.

ट्रॅफिक संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी रहदारी पोलिसांकडून सातत्याने अनेक मोहिमा चालविण्यात येतात. यावेळी पोलिसांकडून वाहन चालकांसोबतची वागणूक चुकीची असते. त्यामुळेच नागपूरकर पोलिसांकडून सभ्य वागणूक मिळण्यासाठी मुंबईचा प्रयोग नागपुरातही व्हावा अशी इच्छा बाळगून आहेत. महिला असो वा पुरुष, रहदारी पोलिसांकडून कायम अभद्र भाषेचाच वापर केला जातो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर जणू काही खूप मोठी घटना घडली किंवा संबंधित वाहन चालक खूप मोठा गुन्हेगार आहे, अशा तऱ्हेची वागणूक पोलिसांची असते. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे वाहनचालकांना नेहमीच अपमानजनक स्थितीचा सामना करावा लागतो. बरेचदा वादविवादाची परिस्थिती उत्पन्न होते. अनेकदा तर पोलिसांकडून संबंधितांना धमकावलेही जाते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे नागरिकही बरेचदा अटीतटीवर येत असल्याचेही निदर्शनास येते. पोलिसांकडून सभ्य वागणूक मिळायला लागल्यास वादविवादाची परिस्थिती उद्भवणार नाही. वाहन चालकही रहदारी नियमांचे उल्लंघन करण्यापासून वाचतील.

हा आहे आदेश

काही दिवसांपूर्वी यादव यांनी मुंबईच्या रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांना, वाहन चालक व नागरिकांशी सभ्यतेने वागण्याचे निर्देश दिले होते. संवाद साधताना सर, मॅडम, श्रीमान, श्रीमती असे संबोधन केल्यास पोलीस आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी संवाद निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी यादव यांनी कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची मुदत दिली होती. याच प्रकारचा प्रयोग  पूर्वी ठाणे येथे तत्कालीन पोलीस आयुक्त डी. शिवानंद यांनी केला होता. हा प्रयोग बराच यशस्वी ठरला होता. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती यादव यांनी केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही अधिकारी नागपुरातही कर्तव्यावर राहिले आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर