शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कामठी कधी हाेणार डुक्करमुक्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून, कचऱ्यासभाेवताल माेकाट जनावरे आणि डुकरांचा सतत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून, कचऱ्यासभाेवताल माेकाट जनावरे आणि डुकरांचा सतत मुक्तसंचार असताे. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून, हे शहर डुक्करमुक्त हाेणार कधी, असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.

राज्यात प्रथम क्रमांकाचे घाणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा महिन्याकाठी ४५ लाख रुपयांचा खर्च हाेताे. असे असताना शहरावासीयांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात संताप व्यक्त हाेत आहे. शहराच्या दैनंदिन साफसफाईसाठी पालिकेने १६० स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या वेतनावर २५ लाख रुपये खर्च हाेतात. परंतु सफाई कामगार याेग्यरीत्या काम करीत नसल्याने बहुतांश भागात कचरा व घाणीचे ढिगारे पसरले राहतात. यामुळे परिसरात डुकरे व माेकाट जनावरे फिरून घाण पसरवितात. त्यामुळे शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या स्वच्छतेसाठी २०१५ मध्ये नगरपालिकेने कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय घेतला. संबंधित कंत्राटदार सर्व प्रभागातील रस्ते, नाल्यांची साफसफाई, घंटागाडीद्वारे कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. यासाठी अमरावती येथील श्री नागरिक सेवा संस्थेला कंत्राट दिले असून, शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांना महिन्याला २० लाख रुपये दिले जातात. मात्र या कंत्राटदार संस्थेचे कर्मचारी याेग्यरीत्या साफसफाई करीत नसल्याने शहरात घाण व कचरा विखुरलेला दिसून येताे.

यासंदर्भात मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांच्याशी चर्चा केली असता, घाण व अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. याबाबत चाैकशी करून कामचुकारपणा करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.