शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

कामठी कधी हाेणार डुक्करमुक्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून, कचऱ्यासभाेवताल माेकाट जनावरे आणि डुकरांचा सतत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून, कचऱ्यासभाेवताल माेकाट जनावरे आणि डुकरांचा सतत मुक्तसंचार असताे. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून, हे शहर डुक्करमुक्त हाेणार कधी, असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.

राज्यात प्रथम क्रमांकाचे घाणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा महिन्याकाठी ४५ लाख रुपयांचा खर्च हाेताे. असे असताना शहरावासीयांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात संताप व्यक्त हाेत आहे. शहराच्या दैनंदिन साफसफाईसाठी पालिकेने १६० स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या वेतनावर २५ लाख रुपये खर्च हाेतात. परंतु सफाई कामगार याेग्यरीत्या काम करीत नसल्याने बहुतांश भागात कचरा व घाणीचे ढिगारे पसरले राहतात. यामुळे परिसरात डुकरे व माेकाट जनावरे फिरून घाण पसरवितात. त्यामुळे शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या स्वच्छतेसाठी २०१५ मध्ये नगरपालिकेने कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय घेतला. संबंधित कंत्राटदार सर्व प्रभागातील रस्ते, नाल्यांची साफसफाई, घंटागाडीद्वारे कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. यासाठी अमरावती येथील श्री नागरिक सेवा संस्थेला कंत्राट दिले असून, शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांना महिन्याला २० लाख रुपये दिले जातात. मात्र या कंत्राटदार संस्थेचे कर्मचारी याेग्यरीत्या साफसफाई करीत नसल्याने शहरात घाण व कचरा विखुरलेला दिसून येताे.

यासंदर्भात मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांच्याशी चर्चा केली असता, घाण व अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. याबाबत चाैकशी करून कामचुकारपणा करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.