शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

नागपुरात पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:28 IST

पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देलोकमत जागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ्यांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.शाळेला सुट्या लागल्या आहेत. अनेक लहान मुले, तरुणांची जलतरण तलावांवर गर्दी होत आहे. यामुळे बहुसंख्य जलतरण तलावाच्या बॅचेस फुल्ल आहेत. एकट्या मेडिकलच्या जलतरण तलावावर सकाळ व रात्रीच्या मिळून १० बॅचेस चालतात. एका बॅचमध्ये ५० ते ६० विद्यार्थी आहेत. अशी स्थिती सर्वच तलावांवरची आहे. परंतु सुरक्षेबाबत हवे तेवढे गांभीर्य पाळत नसल्याचे या क्षेत्रातील खुद्द प्रशिक्षकांचे मत आहे. त्यांच्यानुसार, पोहणे शिकणाऱ्याची सुरक्षा हे पहिले प्राधान्य असले पाहिजे. यासाठी दक्ष ‘लाईफ गार्ड’ व योग्य प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु यावर कुणाचे नियंत्रण नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यकतज्ज्ञाच्या मते, पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्यांपासून ते पोहण्यासाठी येणाºयांना शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु या प्रमाणपत्राकडे दुर्लक्ष केले जाते. कोणतीही खातरजमा न करता अनेक जण पोहत आहेत. याचे गंभीर परिणाम नंतर भोगावा लागतात. संसर्गजन्य आजाराचे प्रमाणही यातून फैलण्याची भीती असते.नखे वाढलेले, जखमीही नकोजलतरण तलावावर नखांची वाढ असलेल्या व्यक्तीला पोहण्यास नियमानुसार बंदी असते. जखमी व्यक्ती अथवा फिट आदी व्याधी असलेल्या कुणालाही जलतरण तलावावर पोहण्यास बंदी आहे. परंतु, शारीरिक व्याधीग्रस्त व्यक्तींच्या तंदुरुस्तीबाबतची कोणतीही तपासणी केली जात नाही.पोहणे शिकणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचेपोहणे शिकणाऱ्यांनी सर्वात प्रथम योग्य जलतरण तलाव व प्रशिक्षकांची माहिती घेऊनच क्लासेस लावावे. प्रशिक्षकांनी सांगितल्यानंतरच कंबरेला ‘फ्लोट’ बांधूनच पाण्यात उतरावे. ‘फ्लोट’ची गाठ योग्यरीत्या बांधल्याची खातरजमा करावी. पाण्यात क्लोरिनचे प्रमाण अधिक असल्यास डोळ्यात जळजळ होऊन त्रास होण्याची शक्यता असते. त्यासाठी गॉगल्सचा वापर करावा. प्रशिक्षकांनी सांगितल्याखेरीज पाण्यात उडी मारू नये. लहान मुले पोहत असतील तर पालकांनीही याकडे लक्ष द्यायला हवे.

टॅग्स :SwimmingपोहणेDeathमृत्यूnagpurनागपूर