शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मेट्रो रेल्वेमधील व्हीसीबी अचानक बंद पडते तेव्हा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 20:57 IST

एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली.

ठळक मुद्देमहामेट्रोची मॉक ड्रील : ४६ प्रवाशांना सुरक्षितपणे आणले स्टेशनवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून खापरीच्या दिशेने निघालेली मेट्रो रेल्वे काही अंतरावर अचानक थांबविण्यात आली. ट्रेनच्या व्हॅक्युम सर्किट ब्रेकरमध्ये (व्हीसीबी) (विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा) बिघाड झाल्याने ट्रेन थांबविण्यात आली. लगेच व्हॅक्युम सर्किट ब्रेकर पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, मात्र ते सुरू होत नव्हते. याची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. अशाप्रसंगी ४६ प्रवाशांना स्टेशनवर सुरक्षित आणण्यात आले. मंगळवारी घेतलेली महामेट्रोची मॉक ड्रील यशस्वी ठरली.घटनेचा तपशील जाणून घेताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसरे पँटोग्राफ उभारण्याचे व व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर लगेच दुसरे पँटोग्राफ उभारण्यात आले, मात्र तरीही व्हॅक्युम सर्किट ब्रेकर बंद होत नव्हते. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली व प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्याची परवानगी घेतली.प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याची घोषणा करण्याचे निर्देश ट्रेन ऑपरेटरला देण्यात आले. प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याच्या आधी व्हायाडक्टवरचे लाईट सुरूकरण्यात आले. तसेच ट्रेन ऑपरेटरला आपातकालीन दार उघडण्याचे आदेश देत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर साऊथ एअरपोर्ट स्टेशनच्या कंट्रोलरला याची माहिती देण्यात आली. रेल्वेतून सर्व ४६ प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर सर्वांना साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनकडे जाण्याची सूचना दिली. दोन दिव्यांग नागरिकाला स्ट्रेचरवरून नेण्यात आले. शेवटी सर्व प्रवासी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर आल्याची माहिती या स्टेशन कंट्रोलरने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. रिकामी रेल्वे डेपोला पाठविण्यात आली.प्रवासादरम्यान ट्रेन बंद पडल्यास प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर सुरक्षित आणण्यासाठी कशा प्रकारच्या योजना कराव्यात, यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मॉक ड्रील यशस्वीरीत्या केवळ २० मिनिटात पूर्ण झाली. मॉक ड्रील पूर्ण झाल्याची सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.बुधवारपासून दर १५ मिनिटांनी मेट्रोमहामेट्रोतर्फे बुधवार, २७ नोव्हेंबरपासून वर्धा मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी दरम्यान (रिच-१) ताशी ८० किमी वेगाने दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा नागरिकांना उपलब्ध देण्यात येत आहे. सध्या केवळ २५ मिनिटात नागरिकांना सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी इंटरचेंजदरम्यान प्रवास करता येत आहे. बुधवारपासून प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोNAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन