शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

...जेव्हा नाती रक्तरंजित होतात! अलीकडच्या काळात रक्तांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या हत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:57 IST

Nagpur : यवतमाळ शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून केलेला खून, गडचिरोलीत वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाची जंगलात लावलेली विल्हेवाट तसेच गोंदियात कौटुंबिक वादातून वडिलानेच केलेला मुलाचा खून.

राजेश शेगोकारनागपूर : नातं हे केवळ रक्ताचेच नसते, तर प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे असतं. जेव्हा या तिन्ही गोष्टी हरवतात, तेव्हा नातं फक्त नावापुरते उरतं, त्यामधूनच मग वाद, विसंवाद, हेवेदावे होतात अन् त्याची परिसीमा गाठली की रक्ताची नातीसुद्धा रक्तरंजित होतात. यवतमाळ शहरालगत पिंपळगाव बायपासवर मोठ्या भावाचा लहान भावाने लोखंडी रॉडने मारहाण करून केलेला खून, गडचिरोलीत वडिलांची हत्या करून मुलाने मित्राच्या मदतीने वडिलांच्या मृतदेहाची जंगलात लावलेली विल्हेवाट तसेच गोंदियात कौटुंबिक वादातून वडिलानेच केलेला मुलाचा खून. गेल्या आठवड्यातील या ठळक घटना, अलीकडच्या काळात रक्तांच्या नात्यांमध्ये होणाऱ्या अशा हत्यांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. मायेचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा किल्ला मानल्या जाणाऱ्या घरात रक्ताच्याच नव्हे तर इतर नात्यातही गोडवा होता; पण आताच्या काळात त्याच घरातली सख्खी नाती एकमेकांचे जीव घेताना दिसत आहेत. ही केवळ गुन्हेगारी घटना नाही, तर एका सामाजिक अधःपतनाचं स्पष्ट लक्षण आहे.

बदलत्या काळातील धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे. पूर्वी जिथे एकत्र कुटुंबात एकमेकांचा आधार होता, तिथे आता विभक्त कुटुंबात माणसं एकटी पडत चालली आहेत. मोबाइल, सोशल मीडिया आणि टीव्हीवरच्या नात्यांचं अतिरंजित नाटकीकरण यामुळे खरी नाती फक्त नावापुरती उरली आहेत. संवादाच्या जागी मेसेज आणि सहवासाच्या जागी स्क्रीन आली आहे. जवळ असूनही अंतर वाढलं आहे. ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे मनातली खदखद बाहेर येण्याऐवजी आतच साठते आणि तीच एका क्षणी हिंसक रूप घेत असल्याचं दिसतं. 

काही घटनांमागे पैशासाठी, संपत्तीच्या वादासाठी किंवा स्वार्थासाठी नात्यांचा बळी दिला जातो तर काही हत्यांमागे वाढती व्यसनाधीनता व ती पूर्ण करण्याकरिता असणारी पैशांची गरज दिसत आहे. काहींना वाढत्या अपेक्षांची पूर्तता करण्यात येणारे अपयश, स्पर्धेची भीती, विश्वासघात अशा अनेक कारणांमधून मग अनेकांना तणाव, नैराश्य, रागावर नियंत्रण न राहणं, अशा समस्या उद्भवतात ज्याचा उद्रेक कधी-कधी हिंसक होतो. त्यामुळे मानसिक आरोग्य हेही यामागचं एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे. अशा वेळी हा प्रश्न केवळ व्यक्तीचा न राहता कौटुंबिक व सामाजिक होतो. अशा हिंसक प्रवृत्तीच्या कारणांची उत्तरे पोलिसांत किंवा कोर्टात पूर्णपणे मिळणार नाहीत तर त्याचा शोध घरातून सुरू व्हायला हवा. समुपदेशन, संवाद, सहनशीलता या उपचारांमध्ये आपलेपणाची ओल टिकवून ठेवायला हवी, त्यामुळे आज सर्वाधिक गरज आहे ती नात्यांना घट्ट पकडून ठेवण्याची, संवाद साधण्याची आणि रागाच्या क्षणी थांबून विचार करण्याची. 

नाती कमावणे सोपं आहे; पण ती जपणं ही खरी कला आहे. प्रेम, विश्वास आणि संवादाची नाळ तुटली की, रक्ताची नातीसुद्धा रक्तरंजित होतात. समाज म्हणून आपण जर वेळेवर सावध झालो नाही, तर उद्याचं चित्र अजून भयावह असेल. घराचे दरवाजे बंद करणे सोपे असते; पण मनाचा दरवाजा उघडा ठेवणं फार महत्त्वाचं आहे, तो जोवर उघडा राहील तोवर अनेक प्रेमाची नाती प्रवेश करतील, आनंद देतील त्यामुळे तो दरवाजा बंद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.. फक्त दरवाजा दोन्ही बाजूंनी उघडणारा असावा! 

टॅग्स :nagpurनागपूर