शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:52 IST

कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देग्राहक चळवळीच्या स्थितीसंदर्भात व्यक्त केली नाराजीवयाच्या ८३ व्या वर्षीही चित्तवृत्ती अजूनही शाबूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७१-७२ चा काळ असेल. भाई बर्धन, साठे आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्या कामगार आंदोलनांचा जोर वाढत होता. त्याचदरम्यान नागपुरात महालातील एका शमीवृक्षाच्या खाली भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी व राजाभाऊ पोफळी इतर कार्यकर्त्यांसोबत त्या दिवशी पार पडलेल्या यशस्वी संपाबाबत चर्चा करीत बसले होते. त्याचवेळी तेथे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आले आणि आंदोलनात भरडल्या गेलेल्या ग्राहकांवर कटाक्ष टाकला. त्यांच्या त्या शब्दातून ग्राहकांच्या एकजुटीचा बिगुल वाजला आणि ग्राहक चळवळीचा पाया रोवला गेला. या चळवळीचे पहिले खांदेकरी ठरले ते राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी. आज ते वयाची ८३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रकृतीने अगदी जर्जर झाले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत त्यांची चित्तवृत्ती शाबूत आहे आणि ग्राहक चळवळीविषयी ते भरभरून बोलतात.कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. खरे तर समाजासाठी कायदे असतात. मात्र, सध्या कायद्यासाठी समाज आहे का? अशी शंका समाजातील एकूणच वैचारिक स्थितीवरून त्यांनी व्यक्त केली. कामगार आंदोलनाच्या काळात उद्योगपती घराण्यांचा विरोध करताना प्रत्येक व्यापारी हा ग्राहक असतो, याचे भान नव्हते. हे भान जेव्हा आले तेव्हा ग्राहकहितासाठी काम करण्याची गरज भासली. तेव्हाही ग्राहकहिताचे कायदे होते. मात्र जागृती नव्हती आणि ते कायदे पाळले जात नव्हते. म्हणूनच १९७१-७२ मध्ये उपभोक्ता मंच उभी राहिले. द्विसाप्ताहिक सुरू झाले आणि १९७४ मध्ये विदर्भासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे रूपांतरण अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये झाल्याचे राजाभाऊ सांगत होते.या संस्थेची धुरा दत्तोपंत ठेंगडी यांनी माझ्या खांद्यावर दिली. त्या काळात आंदोलने हिंसक व उग्र असत. आम्हीही तीव्र होतो मात्र वात्रट नव्हतो. त्याबद्दल वैचारिक विरोधक असलेले भाई बर्धन यांनीही कौतुक केले आणि नंतर आमच्या आंदोलनाचे अनुकरण सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. समाजाभिमुखतेसाठी सुरू झालेल्या ग्राहक चळवळीने अनेक यश पदरात पाडले आणि ग्राहकांचे हित साधले गेले. मात्र, आता ही चळवळ समाजाभिमुख असल्याचे दिसत नसल्याची खंतही राजाभाऊंनी व्यक्त केली. कायद्याच्या कचाट्यात अडकून पडलेली ग्राहक चळवळ, असे वर्तमान स्थितीसंदर्भात भाष्य करता येईल, असे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :consumerग्राहकagitationआंदोलन