शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:52 IST

कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देग्राहक चळवळीच्या स्थितीसंदर्भात व्यक्त केली नाराजीवयाच्या ८३ व्या वर्षीही चित्तवृत्ती अजूनही शाबूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७१-७२ चा काळ असेल. भाई बर्धन, साठे आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्या कामगार आंदोलनांचा जोर वाढत होता. त्याचदरम्यान नागपुरात महालातील एका शमीवृक्षाच्या खाली भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी व राजाभाऊ पोफळी इतर कार्यकर्त्यांसोबत त्या दिवशी पार पडलेल्या यशस्वी संपाबाबत चर्चा करीत बसले होते. त्याचवेळी तेथे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आले आणि आंदोलनात भरडल्या गेलेल्या ग्राहकांवर कटाक्ष टाकला. त्यांच्या त्या शब्दातून ग्राहकांच्या एकजुटीचा बिगुल वाजला आणि ग्राहक चळवळीचा पाया रोवला गेला. या चळवळीचे पहिले खांदेकरी ठरले ते राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी. आज ते वयाची ८३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रकृतीने अगदी जर्जर झाले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत त्यांची चित्तवृत्ती शाबूत आहे आणि ग्राहक चळवळीविषयी ते भरभरून बोलतात.कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. खरे तर समाजासाठी कायदे असतात. मात्र, सध्या कायद्यासाठी समाज आहे का? अशी शंका समाजातील एकूणच वैचारिक स्थितीवरून त्यांनी व्यक्त केली. कामगार आंदोलनाच्या काळात उद्योगपती घराण्यांचा विरोध करताना प्रत्येक व्यापारी हा ग्राहक असतो, याचे भान नव्हते. हे भान जेव्हा आले तेव्हा ग्राहकहितासाठी काम करण्याची गरज भासली. तेव्हाही ग्राहकहिताचे कायदे होते. मात्र जागृती नव्हती आणि ते कायदे पाळले जात नव्हते. म्हणूनच १९७१-७२ मध्ये उपभोक्ता मंच उभी राहिले. द्विसाप्ताहिक सुरू झाले आणि १९७४ मध्ये विदर्भासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे रूपांतरण अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये झाल्याचे राजाभाऊ सांगत होते.या संस्थेची धुरा दत्तोपंत ठेंगडी यांनी माझ्या खांद्यावर दिली. त्या काळात आंदोलने हिंसक व उग्र असत. आम्हीही तीव्र होतो मात्र वात्रट नव्हतो. त्याबद्दल वैचारिक विरोधक असलेले भाई बर्धन यांनीही कौतुक केले आणि नंतर आमच्या आंदोलनाचे अनुकरण सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. समाजाभिमुखतेसाठी सुरू झालेल्या ग्राहक चळवळीने अनेक यश पदरात पाडले आणि ग्राहकांचे हित साधले गेले. मात्र, आता ही चळवळ समाजाभिमुख असल्याचे दिसत नसल्याची खंतही राजाभाऊंनी व्यक्त केली. कायद्याच्या कचाट्यात अडकून पडलेली ग्राहक चळवळ, असे वर्तमान स्थितीसंदर्भात भाष्य करता येईल, असे ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :consumerग्राहकagitationआंदोलन