शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा

By admin | Updated: May 13, 2014 00:22 IST

नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा येतील, अशी शंका विख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी सोमवारी व्यक्त केली.

नागपूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर र्मयादा येतील, अशी शंका विख्यात लेखिका तथा रेमन मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय यांनी सोमवारी व्यक्त केली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित मीट द प्रेस कार्यक्र मात त्या बोलत होत्या.

मोदी हे कॉर्पोरेट क्षेत्राचे उमेदवार असल्याने ते त्यांचाच कार्यक्रम राबवतील. काँग्रेस व भाजप यासारख्या मोठय़ा पक्षांना कॉर्पोरेट क्षेत्रातून निधी मिळत आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेत आल्यास ते भांडवलदारांच्या इशार्‍यावर चालतील, अशी शंका रॉय यांनी व्यक्त केली. केंद्रात मजबूत सरकार सत्तेत आले तर ते एककल्ली वागेल. मजबूत सरकार आले तर लोकांना समस्या मांडता येतील, त्यांना न्याय मिळेल. सामाजिक आंदोलनातील कार्यक र्त्यांच्या राजकीय प्रवेशामुळे राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघेल का, असे विचारता यावर ठाम मत मांडता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी नक्षलवादी असल्याचे भासवून साईबाबा यांच्या नावे बोगस वॉरंट काढले. त्यांच्या घराची झडती घेतली. यात संगणक व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आता सहा महिन्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई संशयास्पद आहे. माओवाद्याकडून होत असलेला हिंसाचार सर्मथनीय नाही. परंतु या हिंसाचाराच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

छत्तीसगडमधील हजारो आदिवासींना कारागृहात टाकण्यात आले आहे. नक्षलवादी हे आदिवासीच असल्याने नक्षलवादाचा शोध घेण्याची गरज असल्याचे रॉय यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.(प्रतिनिधी)

निवडणुकीनंतरही बदल नाही

आज सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. दुसरीकडे विकास दर वाढत असल्याचा दावा केला जात आहे. जोपर्यंत स्थानिकांना विकास प्रक्रि येत सामावून घेतले जाणार नाही तोपर्यंत विकास शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर देशातील परिस्थितीत फारसा बदल होणार नसल्याचे मत रॉय यांनी व्यक्त केले.