शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

राजीनामे कधी देता ? नागपूर शहर भाजपा कार्यालयातील शिपायाचे नगरसेवकांना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 10:52 PM

शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची प्रचंड नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सोपविले नाही त्यांना सत्तापक्ष कार्यालयातील शिपायाकडून राजीनामे आणून देण्यासाठी फोन केले जात आहेत.नगरसेवकांचे राजीनामे मागण्याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन टर्म पासून नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. प्रत्येक वेळी निवडणूक जिंकल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जायची. या नोंदणासाठी जाण्यापूर्वी नगरसेवकांकडून राजीनामा पत्रही लिहून घेतले जायचे. हा पक्षशिस्तीचा भाग होता. ही एक परंपरा असून यात चुकीचे काहीच नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, पहिल्यांदाच भाजपाचे नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहचलेल्या नगरसेवकांमध्ये राजीनामा मागण्यावरून नाराजी आहे. अनेकांनी इच्छा नसतानाही राजीनामे लिहून दिले आहेत. काही वरिष्ठ नगरसेवक विविध कारणांनी अद्याप राजीनामे देऊ शकले नाहीत. राजीनामा पक्षाकडे सादर करायचा आहे. मात्र, त्यांना महापालिकेतील सत्तापक्ष कार्यालयातून शिपायाचे फोन जात असून राजीनामा आणून देण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यामुळे नगरसेवक नाराज आहेत. आम्ही पक्षाकडे राजीनामा देणारच आहोत. मात्र, असे शिपायाकडून फोन करून राजीनाम्याची विचारणा करणे अपमानास्पद वाटत आहे. शिपायाला तसा अधिकार आहे का, पक्षाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे एका ज्येष्ठ नगरसेवकाने बोलून दाखविले.भाजपाचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय ४ स्वीकृत नगरसेवक आहेत. प्राप्त माहितीनुसार सुमारे १० नगरसेवकांनी अद्यापही राजीनामे सादर केलेले नाहीत. यात काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. गेल्या कार्यकाळात भाजपाच्या काही नगरसेवकांनी शेवटपर्यंत राजीनामे सादर केले नव्हते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई देखील झाली नव्हती. मात्र, निवडणुकीत यातील काहींचे तिकीट कटल्याचे पहायला मिळाले होते.चार नगरसेवकांचे पत्र मिळायचे आहे : जोशीसत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले की, भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याची पक्षाची परंपरा आहे. यावेळी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना राजीनामे लिहून घ्यायचे विसरून गेले. स्थायी समितीमधील अर्धे सदस्य सेवानिवृत्त होतात.मात्र, त्यांच्यासोबत उर्वरित सदस्य देखील समितीचा राजीनामा देतात. मात्र, यावेळी राजीनामे घेण्यात आले नव्हते. त्यामुळे २४ जानेवारी रोजी आयोजित पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले होते. ज्यांनी सादर केले नाही त्यांना कार्यालयातून फोन करण्यात आले असतील. फक्त चार नगरसेवकांचे पत्र येणे बाकी आहे. या प्रक्रियेला एकाही नगरसेवकाने विरोध केलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर