शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजीनामे कधी देता ? नागपूर शहर भाजपा कार्यालयातील शिपायाचे नगरसेवकांना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:53 IST

शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची प्रचंड नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सोपविले नाही त्यांना सत्तापक्ष कार्यालयातील शिपायाकडून राजीनामे आणून देण्यासाठी फोन केले जात आहेत.नगरसेवकांचे राजीनामे मागण्याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन टर्म पासून नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. प्रत्येक वेळी निवडणूक जिंकल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जायची. या नोंदणासाठी जाण्यापूर्वी नगरसेवकांकडून राजीनामा पत्रही लिहून घेतले जायचे. हा पक्षशिस्तीचा भाग होता. ही एक परंपरा असून यात चुकीचे काहीच नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, पहिल्यांदाच भाजपाचे नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहचलेल्या नगरसेवकांमध्ये राजीनामा मागण्यावरून नाराजी आहे. अनेकांनी इच्छा नसतानाही राजीनामे लिहून दिले आहेत. काही वरिष्ठ नगरसेवक विविध कारणांनी अद्याप राजीनामे देऊ शकले नाहीत. राजीनामा पक्षाकडे सादर करायचा आहे. मात्र, त्यांना महापालिकेतील सत्तापक्ष कार्यालयातून शिपायाचे फोन जात असून राजीनामा आणून देण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यामुळे नगरसेवक नाराज आहेत. आम्ही पक्षाकडे राजीनामा देणारच आहोत. मात्र, असे शिपायाकडून फोन करून राजीनाम्याची विचारणा करणे अपमानास्पद वाटत आहे. शिपायाला तसा अधिकार आहे का, पक्षाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे एका ज्येष्ठ नगरसेवकाने बोलून दाखविले.भाजपाचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय ४ स्वीकृत नगरसेवक आहेत. प्राप्त माहितीनुसार सुमारे १० नगरसेवकांनी अद्यापही राजीनामे सादर केलेले नाहीत. यात काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. गेल्या कार्यकाळात भाजपाच्या काही नगरसेवकांनी शेवटपर्यंत राजीनामे सादर केले नव्हते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई देखील झाली नव्हती. मात्र, निवडणुकीत यातील काहींचे तिकीट कटल्याचे पहायला मिळाले होते.चार नगरसेवकांचे पत्र मिळायचे आहे : जोशीसत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले की, भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याची पक्षाची परंपरा आहे. यावेळी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना राजीनामे लिहून घ्यायचे विसरून गेले. स्थायी समितीमधील अर्धे सदस्य सेवानिवृत्त होतात.मात्र, त्यांच्यासोबत उर्वरित सदस्य देखील समितीचा राजीनामा देतात. मात्र, यावेळी राजीनामे घेण्यात आले नव्हते. त्यामुळे २४ जानेवारी रोजी आयोजित पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले होते. ज्यांनी सादर केले नाही त्यांना कार्यालयातून फोन करण्यात आले असतील. फक्त चार नगरसेवकांचे पत्र येणे बाकी आहे. या प्रक्रियेला एकाही नगरसेवकाने विरोध केलेला नाही, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर