शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

एसटी महामंडळाला ‘अच्छे दिन’ कधी? प्रवासी संख्येत १५ कोटींहून अधिक घट, वर्षभरात महामंडळाचा तोटा २३०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:10 AM

राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला. तर मागील पाच वर्षांत प्रवासी संख्येमध्ये १५ कोटींहून अधिक घट झाली असल्याची माहिती राज्य शासनाकडूनच देण्यात आली आहे.

नागपूर : राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला. तर मागील पाच वर्षांत प्रवासी संख्येमध्ये १५ कोटींहून अधिक घट झाली असल्याची माहिती राज्य शासनाकडूनच देण्यात आली आहे. अशा स्थितीत ‘एसटी’ महामंडळाचे ‘अच्छे दिन’ कधी येतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.एसटी महामंडळातील प्रवाशांची घट रोखण्यासंदर्भात संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रुपनवर इत्यादी सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. २०१६-१७ या वर्षातील अलेखापरीक्षित वार्षिक लेख्यानुसार महामंडळाला २,३१२ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. २०१५-१६ मध्ये हाच आकडा १,८०७ कोटी २३ लाख इतका होता, अशी माहिती लेखी उत्तरात नमूद करण्यात आली आहे. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत प्रवासी संख्येत १५ कोटी ७९ लाख इतकी घट झाल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरूदरम्यान, उत्पन्नात वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रवासी वाढवा योजना, आरामदायी आसन व्यवस्था, वातानुकूलित शिवनेरी बसेसची खरेदी, प्रवासी आकर्षित करण्यासाठी समाजातील २४ विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत, वार्षिक सवलत कार्ड इत्यादी उपायोजनादेखील करण्यात येत आहेत.वर्षनिहाय तोटावर्ष तोटा२०१३-१४ ३८२ कोटी२०१४-१५ ५७२ कोटी ६२ लाख२०१५-१६ १,८०७ कोटी २३ लाख२०१६-१७ २,३१२ कोटी ७२ लाख

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७