शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

अभयारण्य प्रकल्पग्रस्तांसाठी धोरण कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:42 IST

उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याच्या वाढीव क्षेत्रात येणाऱ्या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी वनविभागाने प्रस्ताव मागविले आहेत.

ठळक मुद्देगावकऱ्यांच्या अपेक्षा वेगळ्या वन राज्यमंत्री म्हणतात प्रचलित धोरणानुसार पुनर्वसन

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याच्या वाढीव क्षेत्रात येणाऱ्या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी वनविभागाने प्रस्ताव मागविले आहेत. असे असले तरी हे पुनर्वसन वनविभागाच्या प्रचलित धोरणानुसार होणार की भूसंपादन-पुनर्वसन कायदा-२०१३ नुसार होणार हे मात्र स्पष्ट नाही. पाऊणगाव, गायडोंगरी आणि कवडसी या तीन आबादी गावांमधील ६०५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी गावकऱ्यांनी चर्चा करून ग्रामपंचायतींनी वनविभागाकडे प्रस्ताव द्यावे, असे ठरले आहे. ७ ऑगस्टला वनराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मुंबईतील विशेष बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.या अभयारण्यामध्ये समाविष्ट झालेल्या खापरी, जोगीखेडा (रिठी) परसोडी व चिचगाव (रिठी) या चार गावांतील भूसंपादनाची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर भंडारा जिल्ह्यातील पाऊणगाव, कवडसी, गायडोंगरी या तीन गावांतील ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन यात करायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या प्रचलित धोरणानुसार केल्या जाणाऱ्या या पुनर्वसनासाठी वनविभाग अनुकूल आहे. १९ जुलैला वनराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतही असेच सुतोवाच करण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा प्रति कुटुंबाला १० लाख रुपयांचा मोबदला देणे, अशी पर्यायी तरतूद वनविभागाच्या प्रचलित पुनर्वसन धोरणात आहे. मात्र महसूल विभागाच्या भूसंपादन पुनर्वसन कायदा २०१३ मध्ये शेती किंवा गावठाणातील घरांच्या जागेसाठी शासकीय दराच्या चार पट रक्कम देण्याची व १८ वर्षावरील प्रत्येक सदस्याला १० लाख रुपये भरपाईपोटी देण्याची तरतूद आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे या धोरणानुसारच पुनर्वसन झाले आहे. गावकऱ्यांचा कल या धोरणाने पुनर्वसन व्हावे, याकडे आहे.१९ जुलैला नागपुरात वन आणि आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये प्रकल्पबाधित गावकऱ्यांनी पुनर्वसनासंदर्भात विचारणा केली होती.माजी खासदार शिशुपाल पटले मागील वर्षभरापासून या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. ७ ऑगस्टला मंत्रालयामध्ये होणाऱ्या विशेष बैठकीमध्ये यावर प्राधान्याने निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालमंत्री वॉर रूमच्या यादीत हा विषय समाविष्ठ करण्यात आला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तीन आबादी गावांतील ६०५ कुटुंबांच्या पुनर्वसाचा प्रश्न या अभयारण्याच्या वाढीव क्षेत्रामुळे निर्माण झाला आहे. या गावांचा वाढीव क्षेत्रात समावेश करण्यासोबतच आता त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही तातडीने आणि योग्य मदत मिळेल, अशा पद्धतीने सोडवावा. ही गावे आणि शेती जंगलव्याप्त भागात असल्याने या गावकऱ्यांना शेती करणे आणि गावात राहणे धोक्याचे ठरत आहे.-शिशुपाल पटले, माजी खासदार.

टॅग्स :wildlifeवन्यजीव