शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

विदर्भात अधिवेशन घेऊन काय साधले ?, धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 22:18 IST

अंतिम आठवडा प्रस्तावादम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी

नागपूर : विदर्भात अधिवेशन असताना शेतकऱ्यांबाबत सरकारने उदासीन भूमिकाच घेतली. प्रत्यक्षात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी येत आहेत. विदर्भात अधिवेशन असतानादेखील सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. येथे अधिवेशन घेऊन सरकारने के साधले, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. गुरुवारी त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शासनावर जोरदार टीका केली.शेतकऱ्यांना किती टक्के पिक कर्ज मिळाले हे सरकारने जाहीर करावे. पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्याइतपत अधिकाऱ्यांची हिंमत झाली. याला शासनाची भूमिकाच कारणीभूत आहे. राज्यातील शेतक-याला पीकविमा मिळत नाही. मात्र पीकविमा कंपनीच्या मालकांना 15 कोटी रुपये पगार मिळतो. सरकारचा कर थकविणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाईची हिंमत सरकार दाखवणार का असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.  विदर्भातील सिंचन अनुशेष कायम आहे. न्यायालयात हमी दिलेले विदर्भातील 45 प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत.अनेक धरणात पाणी आहे परंतु कालवे-उपकालवे नाहीत. सरकारने मागील चार वर्षांत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केलेली नाही. समृद्धी आणि बुलेट ट्रेन प्रकल्पातच सरकार धन्यता मानत आहे, असेदेखील मुंडे म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनीदेखील सरकारच्या धोरणांवर टीका केली. विदर्भाला सरकारने काहीच दिले नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.

शिवसेनेने काय केले ?यावेळी मुंडे यांनी शिवसेनेवर देखील टीकास्त्र सोडले. कर्जमाफीचे राज्यभर ऑडिट करू असे सेनेतर्फे सांगण्यात आले होते. सत्तेत असताना अशा ऑडिटची वेळ येते हेच दुर्दैवी आहे. सेनेने नेमके किती ऑडिट केले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 मुंबईचा विकास आराखडा बिल्डरांसाठीमुंबईचा विकास आराखडा म्हणजे 'बिल्डरो का विकास, बीजेपी के पक्षनिधी के साथ' असा प्रकार असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. चार राज्यांच्या निवडणुकी लक्षात घेऊन हा आराखडा प्रलंबित ठेवला आहे. या आराखड्यामुळे मुंबईवरील भर वाढणार आहे. शिवाय या आराखड्यातुन शिवसेनेचे पंख छाटण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचा टोला त्यांनी लगावला.  डिजिटल यंत्रणेच्या सल्ल्यासाठी मुंबईमध्ये आयआयटी पवईसारखी जगविख्यात संस्था असताना तांत्रिक सल्लागार ओरिसा राज्यातून आयात का करण्यात आला असा सवालही मुंडे यांनी सरकारला विचारला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८