शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
2
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
5
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
6
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
7
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
8
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
9
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
10
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
11
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
13
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
14
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
15
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
16
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
17
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
18
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
19
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
20
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल

By गणेश हुड | Updated: August 7, 2025 17:07 IST

Nagpur : बोनस आणि लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कुठे गेले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी  शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला  ९ महिने झाले तरी कर्जमाफी केली नाही. योग्यवेळी कर्जमाफी करु असे सत्ताधारी म्हणतात. परंतु राज्यात गेल्या दोन वर्षात ६ हजार १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  कर्जमाफी व सातबारा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

विदर्भातील शेतकरी धान उत्पादनात आघाडीवर असतानाही धान खरेदी आणि बोनस देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. हमीभाव २३६९रुपये असताना शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून केवळ १७००-१८००  रुपये मिळत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या बोनससाठी २५ मार्च २०२५ चा आदेश असूनही बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. केंद्रावर खताची टंचाई असून, कंपन्या लिंकींग करून जबरदस्तीने इतर वस्तू विकत आहेत. कृषी विभाग यावर कारवाई न करता केवळ केंद्रावर दोष टाकत आहे.

लाडक्या बहिणींना दरमहा   २१००  रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप याची पूर्तता केलेली नाही. राज्यभरातील कंत्राटदारांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यातून अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून, हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. हे सरकार आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत असून, सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.  

९ ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रा निघणारराष्ट्रवादी कॉंग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकातून  ओबीसी जनजागृती मंडल यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवितील. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.  ही मंडल यात्रा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.  यात जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नही मांडले जातील. शरद पवार हे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले मुख्यमंत्री होते. 

बॅलेटवर निवडणुका घ्याव्याईव्हीएम व मतदार याद्यांचा घोळ, डुपलीकेट मतदार यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. जगातील तज्ज्ञांनी ईव्हीएम सुरक्षीत नसल्याचा दावा करुन याचा निवडणुकीत वापर करू नये असे म्हणले आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख