शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल

By गणेश हुड | Updated: August 7, 2025 17:07 IST

Nagpur : बोनस आणि लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कुठे गेले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी  शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला  ९ महिने झाले तरी कर्जमाफी केली नाही. योग्यवेळी कर्जमाफी करु असे सत्ताधारी म्हणतात. परंतु राज्यात गेल्या दोन वर्षात ६ हजार १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  कर्जमाफी व सातबारा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

विदर्भातील शेतकरी धान उत्पादनात आघाडीवर असतानाही धान खरेदी आणि बोनस देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. हमीभाव २३६९रुपये असताना शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून केवळ १७००-१८००  रुपये मिळत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या बोनससाठी २५ मार्च २०२५ चा आदेश असूनही बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. केंद्रावर खताची टंचाई असून, कंपन्या लिंकींग करून जबरदस्तीने इतर वस्तू विकत आहेत. कृषी विभाग यावर कारवाई न करता केवळ केंद्रावर दोष टाकत आहे.

लाडक्या बहिणींना दरमहा   २१००  रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप याची पूर्तता केलेली नाही. राज्यभरातील कंत्राटदारांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यातून अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून, हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. हे सरकार आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत असून, सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.  

९ ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रा निघणारराष्ट्रवादी कॉंग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकातून  ओबीसी जनजागृती मंडल यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवितील. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.  ही मंडल यात्रा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.  यात जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नही मांडले जातील. शरद पवार हे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले मुख्यमंत्री होते. 

बॅलेटवर निवडणुका घ्याव्याईव्हीएम व मतदार याद्यांचा घोळ, डुपलीकेट मतदार यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. जगातील तज्ज्ञांनी ईव्हीएम सुरक्षीत नसल्याचा दावा करुन याचा निवडणुकीत वापर करू नये असे म्हणले आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख