शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
4
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
5
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
6
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
7
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
8
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
9
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
10
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
11
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
12
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
13
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
15
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
16
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
17
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
18
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
19
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
20
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे

कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल

By गणेश हुड | Updated: August 7, 2025 17:07 IST

Nagpur : बोनस आणि लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कुठे गेले?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी  शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला  ९ महिने झाले तरी कर्जमाफी केली नाही. योग्यवेळी कर्जमाफी करु असे सत्ताधारी म्हणतात. परंतु राज्यात गेल्या दोन वर्षात ६ हजार १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  कर्जमाफी व सातबारा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

विदर्भातील शेतकरी धान उत्पादनात आघाडीवर असतानाही धान खरेदी आणि बोनस देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. हमीभाव २३६९रुपये असताना शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून केवळ १७००-१८००  रुपये मिळत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या बोनससाठी २५ मार्च २०२५ चा आदेश असूनही बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. केंद्रावर खताची टंचाई असून, कंपन्या लिंकींग करून जबरदस्तीने इतर वस्तू विकत आहेत. कृषी विभाग यावर कारवाई न करता केवळ केंद्रावर दोष टाकत आहे.

लाडक्या बहिणींना दरमहा   २१००  रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप याची पूर्तता केलेली नाही. राज्यभरातील कंत्राटदारांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यातून अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून, हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. हे सरकार आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत असून, सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग,  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.  

९ ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रा निघणारराष्ट्रवादी कॉंग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकातून  ओबीसी जनजागृती मंडल यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवितील. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.  ही मंडल यात्रा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.  यात जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नही मांडले जातील. शरद पवार हे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले मुख्यमंत्री होते. 

बॅलेटवर निवडणुका घ्याव्याईव्हीएम व मतदार याद्यांचा घोळ, डुपलीकेट मतदार यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. जगातील तज्ज्ञांनी ईव्हीएम सुरक्षीत नसल्याचा दावा करुन याचा निवडणुकीत वापर करू नये असे म्हणले आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरAnil Deshmukhअनिल देशमुख