शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

जिल्हा काँग्रेसमध्ये हे चाललंय तरी काय?, जिल्हाध्यक्षांना डावलून मुळकांना बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:46 IST

Nagpur : गटबाजी चव्हाट्यावर, कशा जिंकणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसची बैठक घेण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस यांनी बोलाविलेल्या या बैठकीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना निमंत्रणच देण्यात आले नाही, तर काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुलक बैठकीत उपस्थित होते. विधानसभेतील एवढ्या मोठ्या पराभवानंतरही या बैठकीत काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. यानिमित्ताने जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये हे चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या गणेशपेठ येथील कार्यालयात झालेल्या बैठकीला खा. श्यामकुमार बर्वे, आ. संजय मेश्राम, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले आदी उपस्थित होते. या बैठकीत अ.भा. काँग्रेसच्या बेळगावच्या अधिवेशनात देण्यात आलेला 'जय बापू, जय भीम, जय संविधान'चा नारा गावागावात पोहोचविण्याचा संकल्प घेण्यात आला. लोकसभेत काँग्रेसचा विजय झाला. विधानसभेत पराजय झाला. मात्र, या पराभवाने खचून जाऊ नका. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्यांवर होत असते.

ताकदीने पक्षाच्या कामाला लागा. आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसह नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वास यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यक्रम निश्चित करून विधानसभा मतदारसंघ व तालुकानिहाय बैठका घेतल्या जातील. शेतकरी, तरुण, महिला, कामगारांचे प्रश्न आजी-माजी पदाधिकारी जिल्हा व तालुका पातळीवर प्रशासनाकडे मांडतील, असा कार्यक्रम देण्यात आला.

मला बैठकीचे निमंत्रणच नाही : आष्टनकर

  • जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष असूनही निमंत्रण देण्यात आले नाही. असे असतानाही आपण पक्षहितासाठी कार्यालयात सर्व व्यवस्था करून दिली. मला कुणी कळविले असते, तर मी स्वतःच बैठक लावली असती, अशी प्रतिक्रिया देत प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी नाराजी व्यक्त केली.
  • निवडणुकीसाठी आपण 3 तालुक्याचे दौरे निश्चित केले आहेत. मंगळवारी काटोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोंढाळी येथे बैठक होती. तीत उपस्थित राहणे आवश्यक होते. विधानसभेतील अशा निकालानंतर तरी काँग्रेसमधील गटबाजी थांबावी, अशी भावना आष्टनकरांनी व्यक्त केली

"एकमेकांबद्दल मनमुटाव राहू शकतो. एवढ्या मोठ्या पक्षात ते चालणारच आहे; पण सर्वांना घेऊन चाललो तर चांगला संदेश जाईल."- संजय मेश्राम, आमदार, उमरेड

"आपण रामटेक विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे खासदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व पदाधिकारी उघडपणे माझ्या प्रचाराला आले. मला मिळालेली ८२ हजार मते ही काँग्रेसची आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून बैठकीला पोहोचलो."- राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर