शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्हा काँग्रेसमध्ये हे चाललंय तरी काय?, जिल्हाध्यक्षांना डावलून मुळकांना बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:46 IST

Nagpur : गटबाजी चव्हाट्यावर, कशा जिंकणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसची बैठक घेण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस यांनी बोलाविलेल्या या बैठकीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना निमंत्रणच देण्यात आले नाही, तर काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुलक बैठकीत उपस्थित होते. विधानसभेतील एवढ्या मोठ्या पराभवानंतरही या बैठकीत काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. यानिमित्ताने जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये हे चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या गणेशपेठ येथील कार्यालयात झालेल्या बैठकीला खा. श्यामकुमार बर्वे, आ. संजय मेश्राम, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले आदी उपस्थित होते. या बैठकीत अ.भा. काँग्रेसच्या बेळगावच्या अधिवेशनात देण्यात आलेला 'जय बापू, जय भीम, जय संविधान'चा नारा गावागावात पोहोचविण्याचा संकल्प घेण्यात आला. लोकसभेत काँग्रेसचा विजय झाला. विधानसभेत पराजय झाला. मात्र, या पराभवाने खचून जाऊ नका. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्यांवर होत असते.

ताकदीने पक्षाच्या कामाला लागा. आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसह नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वास यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यक्रम निश्चित करून विधानसभा मतदारसंघ व तालुकानिहाय बैठका घेतल्या जातील. शेतकरी, तरुण, महिला, कामगारांचे प्रश्न आजी-माजी पदाधिकारी जिल्हा व तालुका पातळीवर प्रशासनाकडे मांडतील, असा कार्यक्रम देण्यात आला.

मला बैठकीचे निमंत्रणच नाही : आष्टनकर

  • जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष असूनही निमंत्रण देण्यात आले नाही. असे असतानाही आपण पक्षहितासाठी कार्यालयात सर्व व्यवस्था करून दिली. मला कुणी कळविले असते, तर मी स्वतःच बैठक लावली असती, अशी प्रतिक्रिया देत प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी नाराजी व्यक्त केली.
  • निवडणुकीसाठी आपण 3 तालुक्याचे दौरे निश्चित केले आहेत. मंगळवारी काटोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोंढाळी येथे बैठक होती. तीत उपस्थित राहणे आवश्यक होते. विधानसभेतील अशा निकालानंतर तरी काँग्रेसमधील गटबाजी थांबावी, अशी भावना आष्टनकरांनी व्यक्त केली

"एकमेकांबद्दल मनमुटाव राहू शकतो. एवढ्या मोठ्या पक्षात ते चालणारच आहे; पण सर्वांना घेऊन चाललो तर चांगला संदेश जाईल."- संजय मेश्राम, आमदार, उमरेड

"आपण रामटेक विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे खासदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व पदाधिकारी उघडपणे माझ्या प्रचाराला आले. मला मिळालेली ८२ हजार मते ही काँग्रेसची आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून बैठकीला पोहोचलो."- राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर