शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जिल्हा काँग्रेसमध्ये हे चाललंय तरी काय?, जिल्हाध्यक्षांना डावलून मुळकांना बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:46 IST

Nagpur : गटबाजी चव्हाट्यावर, कशा जिंकणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसची बैठक घेण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस यांनी बोलाविलेल्या या बैठकीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना निमंत्रणच देण्यात आले नाही, तर काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुलक बैठकीत उपस्थित होते. विधानसभेतील एवढ्या मोठ्या पराभवानंतरही या बैठकीत काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. यानिमित्ताने जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये हे चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या गणेशपेठ येथील कार्यालयात झालेल्या बैठकीला खा. श्यामकुमार बर्वे, आ. संजय मेश्राम, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले आदी उपस्थित होते. या बैठकीत अ.भा. काँग्रेसच्या बेळगावच्या अधिवेशनात देण्यात आलेला 'जय बापू, जय भीम, जय संविधान'चा नारा गावागावात पोहोचविण्याचा संकल्प घेण्यात आला. लोकसभेत काँग्रेसचा विजय झाला. विधानसभेत पराजय झाला. मात्र, या पराभवाने खचून जाऊ नका. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्यांवर होत असते.

ताकदीने पक्षाच्या कामाला लागा. आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसह नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वास यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यक्रम निश्चित करून विधानसभा मतदारसंघ व तालुकानिहाय बैठका घेतल्या जातील. शेतकरी, तरुण, महिला, कामगारांचे प्रश्न आजी-माजी पदाधिकारी जिल्हा व तालुका पातळीवर प्रशासनाकडे मांडतील, असा कार्यक्रम देण्यात आला.

मला बैठकीचे निमंत्रणच नाही : आष्टनकर

  • जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष असूनही निमंत्रण देण्यात आले नाही. असे असतानाही आपण पक्षहितासाठी कार्यालयात सर्व व्यवस्था करून दिली. मला कुणी कळविले असते, तर मी स्वतःच बैठक लावली असती, अशी प्रतिक्रिया देत प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी नाराजी व्यक्त केली.
  • निवडणुकीसाठी आपण 3 तालुक्याचे दौरे निश्चित केले आहेत. मंगळवारी काटोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोंढाळी येथे बैठक होती. तीत उपस्थित राहणे आवश्यक होते. विधानसभेतील अशा निकालानंतर तरी काँग्रेसमधील गटबाजी थांबावी, अशी भावना आष्टनकरांनी व्यक्त केली

"एकमेकांबद्दल मनमुटाव राहू शकतो. एवढ्या मोठ्या पक्षात ते चालणारच आहे; पण सर्वांना घेऊन चाललो तर चांगला संदेश जाईल."- संजय मेश्राम, आमदार, उमरेड

"आपण रामटेक विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे खासदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व पदाधिकारी उघडपणे माझ्या प्रचाराला आले. मला मिळालेली ८२ हजार मते ही काँग्रेसची आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून बैठकीला पोहोचलो."- राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर