शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:06 IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध शिथिल करून दुपारी २ वाजेपर्यंत ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध शिथिल करून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. दुकाने सुरू झाल्याने नागरिक मोबाइलची खरेदी आणि दुरुस्तीसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मोबाइल दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे; पण मोबाइल विक्रेते आणि दुरुस्ती करणारे दुकानदार कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये म्हणून खबरदारी घेत आहेत. ग्राहकांसाठी काउंटरवर सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रुग्णांची वाढती संख्या बघता राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व वर्गवारीतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. जवळपास दोन महिने दुकाने बंद राहिली. नियम आणि अटींतर्गत १ जूनपासून दुकाने सुरू झाली असून, आता सर्वच दुकानांमध्ये ग्राहक गर्दी करीत आहेत. मोबाइल खरेदी, दुरुस्ती आणि अ‍ॅक्सेसरीज खरेदीसाठी नागरिकांची दुकानांत गर्दी होत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणी मुलाच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी नवीन मोबाइलची खरेदी, तर अनेक जण बिघाड झालेला मोबाइल दुरुस्तीसाठी दुकानात येत आहेत. मोबाइल दुकानदारही दुकानात गर्दी होणार नाही, याची काळजी घेत आहेत. नियम पाळताना दुकानात एकाच वेळी एकाच ग्राहकाला मास्क घालून परवानगी देण्यात येत आहे.

कारण काय :

- मोबाइलची बॅटरी बदलण्यासाठी

- चार्जिंग सॉकेट खराब झाले

- स्क्रीन गार्ड बदलण्यासाठी

- नवा मोबाइल घेण्यासाठी

- मोबाइल हँग होत असल्यामुळे

- मोबाइलचा आवाज नीट ऐकू येत नाही

- मोबाइलचा डिस्प्ले बदलून घेणे

बॉक्स :

दोन महिन्यांपासून दुकाने बंद

कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जवळपास दोन महिन्यांपासून मोबाइलची दुकाने बंद होती. आता १ जूनपासून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती आणि नवीन मोबाइल घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत. सुरक्षित अंतर राखण्यासोबत नियमांचे पालन करण्याच्या सूचना आम्ही सातत्याने देत असतो. बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा फटका आमच्या व्यवसायालाही बसला आहे.

दुकानदारांच्या प्रतिक्रिया .....

व्यवसाय ठप्प झाल्याने नुकसान

कठोर निर्बंधांमुळे मागील दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकानेही बंद होती. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात व्यवसाय होत आहे. सर्व सुरळीत होण्यास अद्यापही बराच विलंब लागणार आहे.

-सतीश सावजी, मोबाइल विक्रेते

व्यवसाय सुरळीत होण्यास वेळ लागणार

दुकाने सुरू झाल्याने मोबाइल दुरुस्तीची कामे आता मिळत आहेत. व्यवसाय सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. ग्राहक दुकानात येत नसल्याने दोन महिन्यांपासून घरीच होतो. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. दुकाने बंद होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

-प्रशांत जैन, मोबाइल दुरुस्ती

ग्राहकांच्या प्रतिक्रिया...

सध्या वर्क फ्रॉम होम होत असल्याने चांगल्या दर्जाचा मोबाइल घेतला होता; पण आवाज स्पष्ट येत नसल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो आहे. याशिवाय स्क्रीन गार्डही लावायचा आहे. दोन महिन्यांपासून दुरुस्तीची वाट पाहत होतो.

-अनुज जोशी, ग्राहक

मुलाचे १४ जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू होत आहे. त्यासाठी नवीन मोबाइल विकत घेत आहे. शिवाय जुना मोबाइल हँग होत असल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो आहे. मास्क व सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करीत आहे.

-राजेंद्र सपाटे, ग्राहक