शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

जिथे वीज नाही, नेटवर्क नाही त्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 9:44 AM

कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या चार महिन्यापासून या सर्व योजना ठप्प पडल्या आहेत. आदिवासीचे सर्व विद्यार्थी आपापल्या घरात बसले आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा गंध नाही आणि दुसरा कुठला पर्यायही उपलब्ध नसल्याने आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागातर्फे काही योजना राबविण्यात आल्या आहेत. परंतु कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या चार महिन्यापासून या सर्व योजना ठप्प पडल्या आहेत. आदिवासीचे सर्व विद्यार्थी आपापल्या घरात बसले आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा गंध नाही आणि दुसरा कुठला पर्यायही उपलब्ध नसल्याने आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर होत आहेत.१९७२-७३ पासून महाराष्ट्र शासनाने अतिदुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) लोकांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी आश्रमशाळा समूह योजना कार्यान्वित केली. २०१४ पासून ‘नामांकित शाळा इंग्रजी माध्यम शिक्षण योजना’ सुरू करण्यात आली. १९९०-९१ पासून ‘एकलव्य निवासी शाळा’ हा उपक्रम केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू आहे. हजारो आदिवासी विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. मात्र मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नियमित शाळा, वसतिगृह बंद आहेत. मुलांचे शिक्षण, भोजन नि:शुल्क असल्यामुळे गरीब आदिवासी पालकांना मुलांची विशेष काळजी नव्हती. परंतु आता शाळा बंद असल्यामुळे मुले घरी आहेत. १ जुलैपासून शहरातील बहुतेक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेणे सुरू केले. मात्र आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. आदिवासींच्या ९० टक्के पालकांकडे स्मार्ट फोन, मोबाईल नेटवर्क, मोबाईल रिचार्जकरिता रोख रक्कम नाही, पाठ्यपुस्तके नाहीत, घरी अभ्यासाकरिता पोषक वातावरण नाही. मार्च ते जून असे चार महिने अभ्यास नसल्यामुळे बरेच आदिवासी विद्यार्थी शेतीकाम, इतर किरकोळ काम, पालकांच्या कामात मदत करीत आहेत. याचे दूरगामी परिणाम आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासावर होईल, अशी भीती आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचे या विद्यार्थ्यांच्याबाबतीत काहीच धोरण नाही. कोरोनाच्या परिस्थितीला पुढे करून शासनाने सर्व जबाबदारी गरीब आदिवासी पालकांवर थोपविली आहे.

 शासनाने जबाबदारी स्वीकारावीमार्च महिन्यापासून सर्व आदिवासी पालकांना विद्यार्थी निर्वाह भत्ता रोखीने देण्यात यावा, शालेय पुस्तके घरपोच पुरविण्यात यावी, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी स्मार्ट फोन मोबाईल डाटासह देण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी शिक्षकांना एक एक आदिवासीबहुल गावाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र