शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा!  उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:01 IST

कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात.

ठळक मुद्देपरराज्यात आम्ही परकेच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. राज्यात २० मार्चला लॉकडाऊन झाले. आज एक महिना झाला आहे. पण ही २६ कुटुंबे आजही चिखली चौकात पालाच्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. ते परराज्यातील असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. त्यामुळे रेशनच्या धान्यापासून ते वंचित आहेत. स्थानिक नगरसेवक मतदार नसल्याने त्यांची खायची सोय करीत नाही. स्थलांतर करायचे म्हटेल तर शक्य नाही. आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा, अशी आर्त हाक या कुटुंबीयांनी दिली आहे.

भटक्या जमातीच्या पालात राहणाऱ्या लोकांपर्यंत संघर्षवाहिनी व दीनबंधू संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहचले. तेव्हा या लोकांनी घेरून आम्हालाही धान्य द्या हो, आमच्या घरीही अन्न नाही, पाहिजे तर तुम्ही घरी या, शोधा घरात, अन्न असेल तर नका देऊ, अशा रडवेल्या चेहऱ्यांनी विनवणी केली.या लोकांकडे येथील रेशनकार्ड नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला. पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांविना जगणारी ही माणसे चिलापिलांसह येथे थांबली आहेत. इथले नगरसेवक आपापल्या क्षेत्रातील त्यांच्या व्होटरपर्यंत धान्याच्या किट्स कशा पोहोचतील, याचा कसोसीने प्रयत्न करीत आहेत. जे त्यांचे व्होटर्स नाहीत त्यांच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. नगरसेवकाला धान्याची मागणी करायला गेल्यावर त्यांचे उत्तर असते, ‘कार्ड दाखवा, धान्य घ्या’. या लोकांसाठी हा देश त्यांचा आहे, असे म्हणण्यापुरताच आहे. कारण हे राज्य त्यांच्यासाठी परके झालेले आहे.जिथे भूक आहे तिथे अन्न नाही!संघर्षवाहिनी या भुकेलेल्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. संघटनेजवळ होते नव्हते तेवढे त्यांच्या झोळीतही टाकले. पण शहरात दररोज मोठ्या प्रमाणात भोजनदान सुरू आहे. नगरसेवकांच्या घरून धान्याच्या किट्स वाटल्या जात आहेत. अनेकजण अनावश्यक धान्य गोळा करून ठेवत आहे. काहीजण शिजलेले अन्नही नाकारत आहे. पण जिथे भूक आहे, तिथे अन्न पोहचत नसेल, तर शोकांतिका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश