शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा!  उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:01 IST

कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात.

ठळक मुद्देपरराज्यात आम्ही परकेच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. राज्यात २० मार्चला लॉकडाऊन झाले. आज एक महिना झाला आहे. पण ही २६ कुटुंबे आजही चिखली चौकात पालाच्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. ते परराज्यातील असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. त्यामुळे रेशनच्या धान्यापासून ते वंचित आहेत. स्थानिक नगरसेवक मतदार नसल्याने त्यांची खायची सोय करीत नाही. स्थलांतर करायचे म्हटेल तर शक्य नाही. आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा, अशी आर्त हाक या कुटुंबीयांनी दिली आहे.

भटक्या जमातीच्या पालात राहणाऱ्या लोकांपर्यंत संघर्षवाहिनी व दीनबंधू संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहचले. तेव्हा या लोकांनी घेरून आम्हालाही धान्य द्या हो, आमच्या घरीही अन्न नाही, पाहिजे तर तुम्ही घरी या, शोधा घरात, अन्न असेल तर नका देऊ, अशा रडवेल्या चेहऱ्यांनी विनवणी केली.या लोकांकडे येथील रेशनकार्ड नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला. पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांविना जगणारी ही माणसे चिलापिलांसह येथे थांबली आहेत. इथले नगरसेवक आपापल्या क्षेत्रातील त्यांच्या व्होटरपर्यंत धान्याच्या किट्स कशा पोहोचतील, याचा कसोसीने प्रयत्न करीत आहेत. जे त्यांचे व्होटर्स नाहीत त्यांच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. नगरसेवकाला धान्याची मागणी करायला गेल्यावर त्यांचे उत्तर असते, ‘कार्ड दाखवा, धान्य घ्या’. या लोकांसाठी हा देश त्यांचा आहे, असे म्हणण्यापुरताच आहे. कारण हे राज्य त्यांच्यासाठी परके झालेले आहे.जिथे भूक आहे तिथे अन्न नाही!संघर्षवाहिनी या भुकेलेल्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. संघटनेजवळ होते नव्हते तेवढे त्यांच्या झोळीतही टाकले. पण शहरात दररोज मोठ्या प्रमाणात भोजनदान सुरू आहे. नगरसेवकांच्या घरून धान्याच्या किट्स वाटल्या जात आहेत. अनेकजण अनावश्यक धान्य गोळा करून ठेवत आहे. काहीजण शिजलेले अन्नही नाकारत आहे. पण जिथे भूक आहे, तिथे अन्न पोहचत नसेल, तर शोकांतिका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश