शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा!  उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:01 IST

कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात.

ठळक मुद्देपरराज्यात आम्ही परकेच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. राज्यात २० मार्चला लॉकडाऊन झाले. आज एक महिना झाला आहे. पण ही २६ कुटुंबे आजही चिखली चौकात पालाच्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. ते परराज्यातील असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. त्यामुळे रेशनच्या धान्यापासून ते वंचित आहेत. स्थानिक नगरसेवक मतदार नसल्याने त्यांची खायची सोय करीत नाही. स्थलांतर करायचे म्हटेल तर शक्य नाही. आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा, अशी आर्त हाक या कुटुंबीयांनी दिली आहे.

भटक्या जमातीच्या पालात राहणाऱ्या लोकांपर्यंत संघर्षवाहिनी व दीनबंधू संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहचले. तेव्हा या लोकांनी घेरून आम्हालाही धान्य द्या हो, आमच्या घरीही अन्न नाही, पाहिजे तर तुम्ही घरी या, शोधा घरात, अन्न असेल तर नका देऊ, अशा रडवेल्या चेहऱ्यांनी विनवणी केली.या लोकांकडे येथील रेशनकार्ड नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला. पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांविना जगणारी ही माणसे चिलापिलांसह येथे थांबली आहेत. इथले नगरसेवक आपापल्या क्षेत्रातील त्यांच्या व्होटरपर्यंत धान्याच्या किट्स कशा पोहोचतील, याचा कसोसीने प्रयत्न करीत आहेत. जे त्यांचे व्होटर्स नाहीत त्यांच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. नगरसेवकाला धान्याची मागणी करायला गेल्यावर त्यांचे उत्तर असते, ‘कार्ड दाखवा, धान्य घ्या’. या लोकांसाठी हा देश त्यांचा आहे, असे म्हणण्यापुरताच आहे. कारण हे राज्य त्यांच्यासाठी परके झालेले आहे.जिथे भूक आहे तिथे अन्न नाही!संघर्षवाहिनी या भुकेलेल्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. संघटनेजवळ होते नव्हते तेवढे त्यांच्या झोळीतही टाकले. पण शहरात दररोज मोठ्या प्रमाणात भोजनदान सुरू आहे. नगरसेवकांच्या घरून धान्याच्या किट्स वाटल्या जात आहेत. अनेकजण अनावश्यक धान्य गोळा करून ठेवत आहे. काहीजण शिजलेले अन्नही नाकारत आहे. पण जिथे भूक आहे, तिथे अन्न पोहचत नसेल, तर शोकांतिका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश