शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा!  उत्तर प्रदेशातील २६ कुटुंबीयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:01 IST

कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात.

ठळक मुद्देपरराज्यात आम्ही परकेच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील चिखली चौकात कापडी पाल टाकून २६ कुटुंबीय राहत आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असून, झाडू बनवितात व विकून गुजराण करतात. राज्यात २० मार्चला लॉकडाऊन झाले. आज एक महिना झाला आहे. पण ही २६ कुटुंबे आजही चिखली चौकात पालाच्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. ते परराज्यातील असल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. त्यामुळे रेशनच्या धान्यापासून ते वंचित आहेत. स्थानिक नगरसेवक मतदार नसल्याने त्यांची खायची सोय करीत नाही. स्थलांतर करायचे म्हटेल तर शक्य नाही. आम्ही येथेच थांबतो, पण दोन वेळच्या पोटाची सोय करा, अशी आर्त हाक या कुटुंबीयांनी दिली आहे.

भटक्या जमातीच्या पालात राहणाऱ्या लोकांपर्यंत संघर्षवाहिनी व दीनबंधू संस्थेचे कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहचले. तेव्हा या लोकांनी घेरून आम्हालाही धान्य द्या हो, आमच्या घरीही अन्न नाही, पाहिजे तर तुम्ही घरी या, शोधा घरात, अन्न असेल तर नका देऊ, अशा रडवेल्या चेहऱ्यांनी विनवणी केली.या लोकांकडे येथील रेशनकार्ड नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला. पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांविना जगणारी ही माणसे चिलापिलांसह येथे थांबली आहेत. इथले नगरसेवक आपापल्या क्षेत्रातील त्यांच्या व्होटरपर्यंत धान्याच्या किट्स कशा पोहोचतील, याचा कसोसीने प्रयत्न करीत आहेत. जे त्यांचे व्होटर्स नाहीत त्यांच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही. नगरसेवकाला धान्याची मागणी करायला गेल्यावर त्यांचे उत्तर असते, ‘कार्ड दाखवा, धान्य घ्या’. या लोकांसाठी हा देश त्यांचा आहे, असे म्हणण्यापुरताच आहे. कारण हे राज्य त्यांच्यासाठी परके झालेले आहे.जिथे भूक आहे तिथे अन्न नाही!संघर्षवाहिनी या भुकेलेल्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. संघटनेजवळ होते नव्हते तेवढे त्यांच्या झोळीतही टाकले. पण शहरात दररोज मोठ्या प्रमाणात भोजनदान सुरू आहे. नगरसेवकांच्या घरून धान्याच्या किट्स वाटल्या जात आहेत. अनेकजण अनावश्यक धान्य गोळा करून ठेवत आहे. काहीजण शिजलेले अन्नही नाकारत आहे. पण जिथे भूक आहे, तिथे अन्न पोहचत नसेल, तर शोकांतिका आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश