शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे संघाकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 14:22 IST

संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

ठळक मुद्देपंतप्रधान व गृहमंत्री अभिनंदनास पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचे स्वागत केले आहे. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.यासंदर्भात सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले की, देशाची धार्मिक आधारावर फाळणी झाल्यानंतर भारत व पाकिस्तानच्या तत्कालिन राज्यकर्त्यांनी 1955 साली नागरिकत्व अधिनियम आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन्ही देशातील अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण होणार होते. परंतु, दुदैर्वाने तसे होऊ शकले नाही. पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू व इतर समुदायाच्या लोकांना सातत्याने अन्याय, अत्याचार सहन करावे लागलेत. त्यामुळे त्यांचे सातत्याने भारतात स्थलांतर होत राहिले. या सर्व देशांमधील जनगणनेच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकल्यास तेथील अल्पसंख्याक समाजाच्या लोकसंख्येतील घट अधोरेखीत होते. हे सर्व लोक वेळोवेळी शरणार्थी म्हणून भारतात येत गेले. इतर देशातून आपल्याकडे येणा-या लोकांना परदेशी म्हंटले जाते. परंतु, धार्मिक आधारावर अन्याय, भेदभाव आणि अत्याचार सहन करणा-या या लोकांना भारत हा एकमेव आधार होता. त्यामुळे हे लोक आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवनासाठी भारतात आलेत. परंतु, कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे या लोकांना नागरिकत्त्वाच्या अधिकारांपासून वंचित रहावे लागले. अशा पिडीत, शोषित व अन्यायग्रस्तांना संघ शरणार्थी मानत असल्याचे जोशी यांनी सांगितले. तसेच नागरिकत्त्व संशोधन विधेयकाच्या माध्यमातून या लोकांना दिलासा मिळणार असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. यासंदर्भात सरकार्यवाह म्हणाले की, या विधेयकाबाबत पसरवण्यात आलेला गैरसमज व अपप्रचार यामुळे अशा गोष्टी होत असाव्यात. परंतु, गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट करताना देशातील सर्वांना आश्वस्त केले आहे की, कुणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन पूर्वोत्तर राज्यांमध्ये या विधेयकासंदभार्तील अपप्रचार, गैरसमज दूर करावा असे आवाहन जोशी यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ