शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे संघाकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 14:22 IST

संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

ठळक मुद्देपंतप्रधान व गृहमंत्री अभिनंदनास पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचे स्वागत केले आहे. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी या विधेयकासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विधेयकामुळे पिडीत, शोषितांना न्याय मिळेल आणि अधिकारांची प्राप्ती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.यासंदर्भात सरकार्यवाह भय्याजी जोशी म्हणाले की, देशाची धार्मिक आधारावर फाळणी झाल्यानंतर भारत व पाकिस्तानच्या तत्कालिन राज्यकर्त्यांनी 1955 साली नागरिकत्व अधिनियम आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन्ही देशातील अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण होणार होते. परंतु, दुदैर्वाने तसे होऊ शकले नाही. पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू व इतर समुदायाच्या लोकांना सातत्याने अन्याय, अत्याचार सहन करावे लागलेत. त्यामुळे त्यांचे सातत्याने भारतात स्थलांतर होत राहिले. या सर्व देशांमधील जनगणनेच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप टाकल्यास तेथील अल्पसंख्याक समाजाच्या लोकसंख्येतील घट अधोरेखीत होते. हे सर्व लोक वेळोवेळी शरणार्थी म्हणून भारतात येत गेले. इतर देशातून आपल्याकडे येणा-या लोकांना परदेशी म्हंटले जाते. परंतु, धार्मिक आधारावर अन्याय, भेदभाव आणि अत्याचार सहन करणा-या या लोकांना भारत हा एकमेव आधार होता. त्यामुळे हे लोक आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवनासाठी भारतात आलेत. परंतु, कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे या लोकांना नागरिकत्त्वाच्या अधिकारांपासून वंचित रहावे लागले. अशा पिडीत, शोषित व अन्यायग्रस्तांना संघ शरणार्थी मानत असल्याचे जोशी यांनी सांगितले. तसेच नागरिकत्त्व संशोधन विधेयकाच्या माध्यमातून या लोकांना दिलासा मिळणार असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.लोकसभा व राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. यासंदर्भात सरकार्यवाह म्हणाले की, या विधेयकाबाबत पसरवण्यात आलेला गैरसमज व अपप्रचार यामुळे अशा गोष्टी होत असाव्यात. परंतु, गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट करताना देशातील सर्वांना आश्वस्त केले आहे की, कुणाच्याही अधिकारांचे हनन होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन पूर्वोत्तर राज्यांमध्ये या विधेयकासंदभार्तील अपप्रचार, गैरसमज दूर करावा असे आवाहन जोशी यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ