शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वैचारिक लढाईनेच संघटना बळकट करू; खुर्चीला चिटकून बसण्यात अर्थ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:22 IST

Nagpur : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पक्ष संघटनेत नुसते खुर्चीला चिटकून बसण्यात अर्थ नाही. प्रदेशाध्यक्षपद ही एक संधी आहे. त्यात पक्षसंघटनेसाठी जे काही करता येईल ते करू. पदग्रहणानंतर दोन महिन्यांत आपण १४ जिल्ह्यांचा दौरा केला. आपण मांडत असलेल्या पक्षाच्या वैचारिक भूमिकेला चांगला प्रतिसाद आहे. वैचारिक लढाई स्पष्टपणे लहू तेवढी संघटना बळकट होईल व बळकट संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढून सत्ता गाठता येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

स‌द्भावना शांती यात्रेनंतर सपकाळ यांनी 'लोकमत' भवनला सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, लोकप्रतिनिधी व संघटनेतील पद या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कुणी खूप वर्षापासून एका पदावर आहे म्हणून त्याला हटवावे, हेदेखील योग्य नाही. तर त्याचा परफॉर्मन्स पाहणेही आवश्यक आहे. आपण संघटनात्मक बदलासाठी पावले टाकली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमले असून त्यांचा अहवाल आल्यावर बदलाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

मी माझ्यासाठी एक कार्यकाळ ठेवला असून 'एक व्यक्ती एक पद' याची अंमलबजावणी मी स्वतः पासून केली आहे. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर राजीव गांधी पंचायतराज अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दुसऱ्याला द्यावे, असा प्रस्ताव मी पाठविला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सपकाळांचा अॅक्शन प्लॅन

  • ४० वर्षांखालील तरुणांना ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्त करणार.
  • प्रदेश पदाधिकारी नियुक्त करताना तो लोकप्रतिनिधी किंवा निवडणूक लढलेला असावा.
  • व्यवहार व तत्त्वांशी सांगड घालून पक्षात काही ऑपरेशन करणार. 
  • महाविकास आघाडीही राजकीय अपरिहार्यता आहे. त्यामुळे आतापासून मनसुबे मांडण्यात अर्थ नाही.
  • ईव्हीएम विरोधात लढा लढणार, व्हीव्हीपॅट मोजणीसाठी आग्रह धरणार.

शक्तिपीठ मार्ग अदानीला शक्ती देण्यासाठीमध्य भारतातील खनिज संपदा अदानीच्या गोव्यातील पोर्टपर्यंत थेट पोहोचविता यावी, यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला गेला आहे. हा मार्ग करण्याची कुणाचीही मागणी नाही. शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास विरोध आहे. सरकारकडे लाडकी बहीण, एसटी कर्मचारी, शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. मात्र, शक्तिपीठ मार्गासाठी ८८ हजार कोटी देण्यास सरकार आसुसलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अदानींवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यांची तेथील यंत्रे येथे गडचिरोलीत फिरली पाहिजे यासाठी हे सर्व केले जात आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूरHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेस