शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले

By कमलेश वानखेडे | Published: July 12, 2023 1:47 PM

शिंदे गटातील आमदार अस्वस्थ

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना असुरक्षित वाटू लागले आहे. यावरून सरकारमध्ये कुठेतरी मोठी नाराजी आहे. सर्व घडामोडी अचानक झाल्या. त्यामुळे चिंतेचा विषय आहेच. अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाऊ नये, ही शिंदे गटातील आमदारांची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना झुकते माप द्यायचे. आताही तेच होणार आणि इतर आमदारांकडे दुर्लक्ष करणार. त्यामुळे अर्थमंत्री पदी अजित पवार नकोच, अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा आ. बच्चू कडू यांनी मांडली.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीन इंजिनच्या सरकारमध्ये बिघाडसुद्धा होऊ शकतो. विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करण्याचं मोठे आव्हान सरकारसमोर असणार आहे. बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदे गेली. त्यामुळे आधी आलेल्या आमदारांवर अन्याय होणारच आहे. राष्ट्रवादी आपल्या घासातला घास खात आहे, अशी आमदारांची भावना झाली आहे. त्यामुळे आपला नंबर कटला, तर नाराजी असणारच आहे. कुणाला कोणते खातं द्यायचे, पालकमंत्रिपदी कोणत्या जिल्ह्याचे कुणाला द्यायचे, अशा अनेक भानगडी आहेत. शिंदे गटाला किती मंत्रिपदे मिळतील, याची मला कल्पना नाही, पण तिन्ही नेत्यांनी चांगल्या पद्धतीने सरकार चालवले तर महायुती घट्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार मुंबईत डेरेदाखल, मी मात्र गावी चाललो...

- मंत्रीमंळात आपला नंबर लावाला या आशेने बरेच आमदार मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. मी मात्र आपल्या गावी निघालो आहे. माझ्यात व त्यांच्यात हाच फरक आहे. मुंबईत राहिलो म्हणजेच मंत्रीपद मिळते असे नाही, असेही बच्चूकडू म्हणाले. आपल्याला कुठल्याही पालकमंत्रिपदाची अपेक्षा नाही. जी जबाबदारी आली, ती पार पाडू, पण मंत्रिपदासाठी अद्याप फोन आलेला नाही, असेह त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणBacchu Kaduबच्चू कडूAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना