शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती: बावनकुळे; बेईमानी केल्याने घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 08:01 IST

मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केले.  देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते तेव्हा निसर्गच बदला घेत असतो. शिंदे-फडणवीसांचे सरकार हे नैसर्गिक सरकार आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.   

महाविकास आघाडीच्या काळात  पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

पवारांना इतके काय लागले?  

अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे